पण मी म्हणतो , शिक्षकांना सुट्टी पाहिजे कशाला ?
पाहू या काय काय घडलं ते ......!
दि.3नोव्हें.2020 रोजी
मा.शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे मँडम
जिल्हा परिषद सांगली ,यांना दिलेले निवेदन
विषय - जिल्हा परिषद शिक्षकांना 9 नोव्हें 2020 ते 23 नोव्हें.2020 या कालावधीत दिवाळी सुट्टी मिळणेबाबत.
वरील विषयास अनुसरून , काही संघटनांनी वरिष्ठांशी विनंती केली ; ती अशी की, मार्च महिन्यातील लाँकडाऊन पासून ते आज दि.4/11/2020 अखेर जिल्हा परिषद शिक्षकांनी कोरोना महामारीच्या काळात कोरोना संंबधित सर्व कामे केली आहेत.
चेकपोस्ट ड्युटी,कोरोना कक्ष ड्युटी,कोरोना कॉल सेंटर ड्युटी,माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत सर्वेक्षण या सर्व कामात शिक्षकांनी सतत काम केले आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचे काम देखील सुरू आहे.उन्हाळा सुट्टीतही शिक्षक मुख्यालयी थांबून कोरोना ड्युटी करत होते. तेव्हा आता दिवाळी सुट्टी 9 नोव्हें ते 23 नोव्हे.कालावधी मध्ये शिक्षकांची सर्व कामातून मुक्तता करून दिवाळी सुट्टी देण्यात यावी. असे निवेदन देण्यात आले . तर समाजात फारच उलट सुलट चर्चेला उधाण आले .सुट्टी मागण्याचे कारण म्हणजे परजिल्ह्यातील शिक्षकांना त्यानिमित्ताने काही दिवस गावी जाता येईल. शिक्षकांच्या दिवाळी सुट्टी बाबतचे लेखी आदेश गटशिक्षणाधिकारी यांना द्यावेत ही विनंती. अशी विनंती करून सुट्टी मागून घ्यावी लागते , ही एक शोकांतिका नाही का ? फेब्रुवारी मार्च पासून परजिल्ह्यातील शिक्षक त्यांच्या मूळ गावी गेलेले नाहीत. इतकंच नाही ..! काही शिक्षक 2019 च्या दिवाळी सुट्टीहून शाळेला आलेले आहेत ते आजून आपल्या मूळ गावी गेलेले नाहीत. त्यांना वाटत होतं की उन्हाळ्यात कोरोना संपेल. मग गावी जाऊ .त्यातदेखील ई-पास शिवाय प्रवास शक्य नव्हता . कुणाच्या दवाखाण्यासाठी ,आजारपणासाठी काही शिक्षकांनी प्रवास करण्याचा प्रयत्न केला ; मात्र त्यातूनही चोरून प्रवास करणाऱ्या शिक्षकांना , "तुम्ही तर शिक्षक आहात राव ! " म्हणून खजील केले.
जून मध्ये शाळा सुरू होतील , आता कुठं जा जा आणि ये ये म्हणून काहींनी गावी जाणे पूर्णपणे टाळले . पुढे जून मध्ये शाळा पूर्वतयारी आणि मुख्यालयी हजर होण्याचे आदेश होतेच . त्याच्याशिवाय पगार झाले नाहीत .
त्यानंतर पाठ्यपुस्तक वाटप, तांदूळ वाटप , ऑनलाईन शिक्षण , कोरोना कॉल सेंटरवर ड्युटी, कोरोना केअर सेंटर वर ड्युटी .यामध्ये केवळ मदत करणे असं नव्हे तर बेड ची जबाबदारी शिक्षकांवर होती . कोरोना पेशंट आल्या पासून ते सुखरूप घरी जाईपर्यंत ची जबाबदारी शिक्षकांवर सोपवली होती . माझे कुटुंब माझी जबाबदारी यात अजूनही काही शिक्षक काम करत आहेत . आता पुन्हा दिवाळीनंतर शाळा चालू होतील .मग या वर्षीची दिवाळी इथंच .म्हणजे दिल्या घरी सुखी राहा नव्हे ,दिल्या घरी कशीपण नांद ......
अहमदनगर जिल्हा परिषदेची एक बातमी वाचनात आली. ही बातमी काय सुचवते ? कुणास ठाऊक ?
ऑनलाईन शिक्षणाच्या नावावर अध्ययन-अध्यापन अहवाल मागवले जातात .ऑनलाईन शिक्षण किती मुलांनी पचवले. आणि सुदृढ झाली कुणास ठाऊक ? पण कामात सुटका नाही
सलाम कोविड योद्धयांना
कोरोना काळामध्ये कोणतेही अधिकृत ऑनलाइन शिक्षणाचे प्रशिक्षण न देताही 50% का होईना विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी शिक्षक धडपडत होते . ज्या ज्या ठिकाणी ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था उभी होऊ शकली नाही तेथे ऑफलाइन शिक्षण दिले गेले. वाडी ,वस्तीवर, पाड्यावर चालत जाऊन शिक्षण दिले आणि हे सर्व कार्य सुरू असताना कोवीड ड्युटी करणारेही शिक्षकच होते आणि आहेत. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' सर्वेक्षण करणारेही शिक्षकच आहेत.
सर्वांना असं वाटतं की शिक्षक घरी बसले आहेत. त्यांना आता सुट्टीची काय गरज ? पण हा आरोप करणाऱ्यांनी सर्वप्रथम खरी वस्तुस्थिती काय आहे ? हे जाणून घ्यायला पाहिजे. कोविड काळामध्ये आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांसोबत, पोलिसांसोबत अंगणवाडी सेविका सोबत खांदा लावून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काम केले आहे. राशन दुकानांमध्ये धान्य वाटप करायला शिक्षक .यातून समाजाने हे ही लक्षात घेतलंय की शिक्षकांशिवाय काम प्रामाणिक होत नाही . कोविड ड्युटीवर अनेकांना प्राणांचे बलिदान द्यावे लागले आहे. हे कमी होतं की काय माहीत ? दारूच्या दुकानासमोर तळीरामांची रांग लावायला देखील शिक्षक. ही वस्तुस्थिती नाकारून केवळ शिक्षक या जमातीला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य केली जात असतील तर समाजाने आपली मुलं कुणाच्या हातात द्यायची ? उत्तर तुम्हाला सुचलं असेल , पण गरिबांचा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतोय ! हे ही ध्यानात घ्यायला हवे!
कोरोना काळात काम करणारे आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, सहाय्यक शिक्षक ,परिविक्षाधीन काळातील कर्मचारी यांना तुटपुंज्या पगारावर काम करावे लागले . तरीही कोणत्याही कर्मचाऱ्यांनी विरोध केला नाही .किमान वेतन कायद्यानुसार या प्रत्येकाला किमान अठरा हजार रुपये वेतन देणे बंधनकारक असताना त्याचं आर्थिक शोषण करणाऱ्यांच्या विरोधात कोणीही बोलायला तयार नाही. पण शिक्षकांच्या पगारावर आणि सुट्ट्यावर मात्र सर्व बोलतात.............! ही गोष्ट मनाला खेदाची आहे .जणू " गरीब बिचारे कुणीही हाका ".
भुवया उंचावून शिक्षकांना पाहताना समाजाने हे ही पाहायला हवे की, आजही शिक्षक 27 पेक्षा जास्त अशैक्षणिक (अध्यापन व्यतिरिक्त ) कामे करत आहेत ;आणि सुट्टी देताना मात्र ,"आता शिक्षकांना सुट्टी कशाला पाहिजे ?" असा विचार समाज का करतो ?
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
एखादा ब्लॉग आवडल्यास , पोस्ट वाचताना उजव्या कोपऱ्यात वरील ऑपशन(तीन टिंब ) वर जाऊन आपल्या मित्रांना whatsapp किंवा facebook द्वारे share करु शकता.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
वाचताना माझी व्यथा मांडल्यासारखं वाटलं ,😊
ReplyDeleteमला जे वाटलं ते लिहिलं सर,
Deleteबहुतेक जणांच्या ह्या व्यथा आहेत .....!
Shikshak bharadala jatoy 😔
ReplyDelete