माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Sunday, November 08, 2020

त्याने स्वतःची लायकी सिद्ध केली ..........!

 गरळ ओकणारा संपादक नीच प्रवृत्तीचा ........! 

दिनांक 8 नोव्हेंबर 2020 ,

वॉट्सएप आणि सोशल मीडियावर  मास्तरड्यानो म्हणणाऱ्याची चांगलीच धुलाई केली . काही महिलांनी चपलेची भाषा सुनावली .तर म्हणे तो लोकपत्र चा (सं )पादक .......आता त्या (सं) पादकाची चांगलीच जिरवायची ..

शिक्षकच देश बदलू  शकतात , हे तो फोलपणे विसरला, अन् बालिश बहू बायकांत बडबडला .....

त्याला सं जपून ठेवायचं झालं नाही ...इतकी त्याची  लायकी ज्या देशात शिक्षकांचा अपमान होतो, शिक्षकांबद्दल समाजात द्वेष पसरला जातो, शिक्षकाची प्रतिमा मलिन केल्याचा प्रयत्न होतो त्या देशाचे भविष्य सांगायला विशेष  ज्योतिषाची गरज नसते असे विचारवंत म्हणतात.

  ज्याच्या बुद्धी   आणि तोंड  गटार आणि शौचकूप आहे.त्याला फोन करून अवास्तव  महत्व देऊ नका. आपले  सर्व संघटनांचे  जिल्हा संघटना अध्यक्ष फोन करून त्याची लायकी ठरवतील . संबंधित दैनिकाचे मालक हे मान्य करणार नसतील तर  ज्यांना शिक्षण, शिक्षक यांचेबद्दल प्रचंड आदर आहे त्यांचेकडे गाऱ्हाणे मांडून त्याला संपादक पदावरून पदच्युत करण्यास भाग पडायला लावले पाहिजे .

शिक्षक व  शिक्षक पेशाबद्दल कपी पुत्रांनो,पार्श्वभाग दुखतो का?हत्तीच्या कानातून उतले आहात का? ही विधाने करून  समस्त शिक्षक आणि विशेषतः महिला शिक्षकांचा घोर अपमान केल्याबद्दल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करू या. मा. नामदार वर्षाताई  गायकवाड यांनी सुट्टी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.तो निर्णय पदवीधर निवडणूक आहे म्हणून लोकशाही आघाडी सरकारने घेतला. असे लेखात म्हटले असल्याने प्रत्यक्ष पणे लोकशाही आघाडी सरकारला टार्गेट केले आहे.त्यांनाही याबाबत कारवाई करावी म्हणून आग्रह धरू या.जाहीरपणे समस्त शिक्षक बांधवावर जहरीली टीका केल्याबद्दल  केवळ माफीनामा  न मागता त्याच्यावर कारवाही करण्याची मागणी  दैनिकांच्या मालकांकडे आग्रह धरू या. शिक्षक काय काम करतात हे समाजाला सांगायची गरज नाही. समयदान करणारे, पदरमोड करणारे,संवेदनशील असणारे  , चाकोरीबाहेर जाऊन काम करणारे व विद्यार्थ्यांची दुसरी आई व अध्यात्मिक बाप ही भूमिका पार पाडणारे शिक्षकच असतात.लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या वर्तमानपत्रांना समाजातील विषमता, अन्याय, दु:ख ,पदाची मस्ती व भ्रष्टाचार यावर लिहिण्याचा पूर्ण अधिकार आहे,पण अश्लिल भाषेचा वापर करून कोणी लेखन करत असल्यास कायद्याने त्याला दणकाही देता येतो याचा विसर पडलेला दिसतो.

        समस्त शिक्षक बांधव यानिमित्याने एकत्र येणे गरजेचे आहे. अहो राग कुणाला  नाही ? मुंगीवर पाय पडला तर मुंगी चावा घेते .गाय सुद्धा शिंगे उगारून मदमस्त सिंहाला घायाळ करू शकते .ही एकता  दाखविण्याची वेळ आली आहे. शासन सांगेल ते काम शिक्षक करण्यास सदैव तत्पर असतात.मुले हेच शिक्षकांचे दैवत असते. मुलांशिवाय शाळा म्हणजे आत्म्याशिवाय शरीर .हे फक्त  शिक्षकच जाणू शकतात . ही पहा त्याची लायकी ..!

भाषा कशी आहे पहा त्याची ................

संपादक झाले म्हणून काय झालं ....
अशी असभ्य बोलणे त्याला शोभते का ?

मा. शिक्षक आमदार कपिल पाटील व राज्यातील सर्व  शिक्षक आमदार यांना विधान परिषदेत शिक्षक पेशाबद्दल अपशब्द काढल्याबद्दल सदर लेख लिहून सामाजिक सलोखा बिघडविल्याबद्दल ठोस कारवाई केली पाहिजे ..

         सुट्टी बाबत म्हणाल तर  त्यांनी हे माहीत करून घ्यावं की न्यायव्यवस्था सांभाळणारे न्यायमूर्ती व शिक्षण व्यवस्था सांभाळणारे शिक्षक/प्राध्यापक यांनाच दीर्घ सुट्टी दिली आहे.ही  दीर्घ सुट्टी या दोनच क्षेत्रात काम करणाऱ्यांना  का दिली जाते.  त्याच्या पाठीमागे कायदेशीर आणि मानसशास्त्रीय दृष्ट्या कारण शोधावे .न्यायालयाच्या आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीच्या  कामाचे मूल्य करता येत नाही.

दैनिक  लोकपत्र मधून  गलिच्छ, असंसदीय भाषेतील अग्रलेख लोकपत्र च्या औरंगाबाद आवृत्तीमध्ये  संपादकीय  कॉलम मध्ये प्रकाशित झाला , हा लेख लिहिणारा औरंगाबाद येथील लोकपत्रचा संपादक रविंद्र तहकीक आहे. हा एक अत्यंत विकृत विचारसरणीचा व्यक्ती आहे. त्याची भाषाशैली वाचून कुणाच्याही लक्षात येईल की, संपादक किंवा पत्रकार होण्याची त्याची पात्रता आणि लायकी अजिबात  नाही.तो आज ज्या पदावर विराजमान होऊन पगार घेत आहे, ते केवळ शिक्षणामुळेच..! पण याची त्याला आठवण नाही. त्याला घडविण्यात कोणत्या ना कोणत्या  शिक्षकांचा (मास्तरांचाच)  वाटा आहे.हे तो सहज विसरला आहे . मात्र  हा  तहकीक कृतघ्न आहे ,हे  नक्की ! विकृत बुद्धीच्या रविंद्र तहकीक चा सर्व शिक्षक संघटनांनी मग ती कोणतीही संघटना असो .  प्राथमिक ,माध्यमिक किंवा महाविद्यालयीन संघटना असो .जाहीर निषेध करावा ;सर्वांनी त्याचा निषेध  केलाच पाहिजे . ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या शिक्षकांना मास्तरानो असा शब्द वापरून  समस्त शिक्षक बांधवांना अवमान करणाऱ्या संपादकाचा व वृत्तपत्राचा जाहीर निषेध.........असं म्हणून  निषेध होणार नाही .त्याचा धंदा बंद झाला पाहिजे .कोकलून कोकलून देखील त्याचं बातमीपत्र विकल गेलं नाही पाहिजे याची दक्षताआता  स्थानिक शिक्षकांनी   घ्यावी .घेणाऱ्यांना बंद करायला सांगावं .               


       कोरोना महामारी च्या काळात ऑनलाईन शिक्षण चालू असताना ज्याला  कोणत्याही गोष्टीची जाणीव नाही स्वतःला शहाणा समजून आपल्या घटनेने दिलेल्या  अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करून शिक्षकांचा व शिक्षणाचा अपमान करणारा संपादक , जे आमदार कपिल पाटील साहेब शिक्षकांच्या साठी अहोरात्र काम करत असतात त्यांच्याबद्दल गैर शब्द वापरुन लेखन करणारा  संपादक ज्यालाऑनलाईन शिक्षण म्हणजे काय? हे माहित नाही विद्यार्थ्यांच्या आरोग्याची मानसिकतेचे कोणतीही तमा नाही, काळजी नाही अशा संपादकच अशा प्रकारचे वक्तव्य करून आपल्या लेखनातून आपल्या बुद्धीची संकुचित वृत्ती दाखवून देत आहे. अशा संपादकाचा व त्याच्या तिचा मनोवृत्तीचा  संपूर्ण भारतभर जाहीर जाहीर  जाहीर निषेध करत आहे. तमाम महाराष्ट्रातील शिक्षक बंधू-भगिनी यांच्यावतीने या संपादकाचा 🏴जाहिर निषेध 🏴जाहीर निषेध 🏴जाहीर निषेध 🏴

            

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

दैनिक लोकपत्रचे संपादक यांनी शिक्षकांच्याबद्दल आपल्या संपादकीय लेखांमध्ये शिक्षकांच्या बाबतीत अतिशय घृणास्पद व असंवेदनशील विधाने केलेली आहेत त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष व अतिशय संतापाचे वातावरण झाले आहे  त्या अनुषंगाने त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात यावी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच शिक्षक भारती चे आमदार कपिल पाटील यांचा एकेरी भाषेत उल्लेख करून अवमान केला आहे .त्यांनी शिक्षकांच्या विषयी असंवैधानिक भाषा वापरली आहे त्याअनुषंगाने   त्याच्यावर   उचित कारवाई व्हावी .कारवाही न झाल्यास  शिक्षकांच्या सन्मानासाठी  सर्व शिक्षक संघटना तीव्र  आंदोलन करतील .

याला कुणी मापं घ्यायला ठेवलं होतं कुणास ठावं !  याने शिक्षकांवर तर आरो केले आहेतच ,शिवाय सरकारवर देखील आरोप केले आहेत .

त्याला म्हणावं शाळा सुरू करण्यासाठी चे नियम पहा म्हणावं ....!

 1) शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासह सर्व प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनर असावे.

2) प्रत्येक प्रवेशद्वारावर हॅण्ड सॅनिटायझर बसवावे.

3) शाळेत प्रवेश करण्यापूर्वी गणवेश आणि पादत्राणांचे सानिटायझेशन करावे.

4) गेटजवळ विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, यांचे नियंत्रण करावे.

5) वर्गातील दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे अंतर असावे.

6) वर्ग भरताना शिक्षकांनी सॅनिटायझरचा वापर करून प्रवेश करावा. तसेच मास्क आणि हातमोजांचा वापर करावा.

7) वर्गात तंत्रज्ञानाचा वापर करावा.

8) शाळांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करावा.

9) बसने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व बस चालकासाठीही नियमावली देण्यात आली आहे.

10) 20 पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र येतील अशा कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करू नये.

11) शाळेतील मध्यान्न भोजन सकाळी 10 ते 1 वेळात विद्यार्थ्यांची गट विभागणी करून द्यावे.

12) स्वयंपाक घरातील कर्मचाऱ्यांनी आरोग्य विषयक व सर्व सुरक्षा उपायांचे पालन करावे.

13) शिकवण्यासाठी रिमोट लर्निंग, ऑनलाइन लर्निंग आणि बेल्डेड लर्निंग या पर्यायांचा वापर करावा.

14) स्वच्छतागृहात गर्दी होणार नाही असे नियंत्रण करावे.

15) स्वच्छतागृहात मुबलक पाणी, साबण, हॅण्डवॉशचा पुरवठा करण्यात यावा.

16) विद्यार्थ्यांच्या तापमानाची रोज नोंद ठेवावी.

17) शाळेत विद्यार्थ्यांचे नियमित परीक्षण व्हावे.

18) शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे स्वच्छतेचे परीक्षण व्हावे.

हि सर्व व्यवस्था उभी  कोण करणार आहे ? हे करायला छोट्या शाळांना किमान 25,000 रूपये तर मोठया शाळांना एक लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. व्यावसायिक दराने भरावे लागणारे वीजबील, पाणीबील थकले असताना हा खर्च भागवण्यासाठी आर्थिक मदत जाहीर केलेली नाही. कोणत्यातरी शाळेला शक्य आहे का ?

 ज्या गावच्या सरपंच ची टर्म संपली तेव्हा प्रशासक म्हणून शिक्षकांची नेमणूक दिली नाही .अध्यापणव्यतिरिक्त 27 कामांची यादी आहे की जे शिक्षक महाराष्ट्रात कोणत्या ना कोणत्या जिह्यात काम करतांना दिसतात .

     

आणि शिक्षकांना सुट्टी का हवी हा लेख आधीच प्रसिद्ध केला आहे , हा जर वाचा म्हणावं त्याला .....

शिक्षकांना सुट्टी का हवी .....! 

 👆👆👆👆👆👆

जरूर वाचा ...


#####################################
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
या ब्लॉगला फॉलो करा ; की जेणेकरून नवीन लेख पब्लिश झालेची नोटीफिकेशन आपोआप मिळेल.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तसेच ब्लॉगच्या होम पेज वरील कॅटेगरी (catagery ) वरील ऑप्शन ला जा आणि इतर ब्लॉग वाचा .आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना  whatsapp, facebook द्वारे शेअर करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
  एखादा ब्लॉग आवडल्यास , पोस्ट वाचताना उजव्या कोपऱ्यात वरील ऑपशन(तीन टिंब ) वर  जाऊन आपल्या मित्रांना  whatsapp किंवा facebook द्वारे  share करु शकता.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment