गुरू: ब्रह्मा ,गुरु: विष्णू, गुरुर्देवो महेश्वर:
गुरू: साक्षात परब्रह्म.....
आणि
गुरू ईश्वर तात माय, गुरूविना जगी कोण न्हाय ....
हे मात्र आजच्या काळात सर्वांचे विस्मरणात गेले आहे .भारताच्या इतिहासातील उदाहरण असो की आजच्या इंडियातील असो ..........जेव्हा जेव्हा राष्ट्रावर आपत्ती आली तेव्हा शिक्षकांनी आपल्या बळाचा आणि विचारांचा उपयोग करून राष्ट्रवारील आपत्ती बाजूला सरली आणि राष्ट्राला वाचवलं .पण ही झाली इतिहासातील आणि पुराणातील वानगी. तुम्ही म्हणाल पुराणातील वानगी पुरारणातच चांगली . पण तसं नाही , शिक्षक हा शिक्षक असतो याचा आज मात्र सर्वानाचं विसर पडलेला आहे .
जेव्हा जेव्हा समाजावर संकटे आली तेव्हा शिक्षक प्राणी दंड थोपटून तयार झाला; पण आज त्याची पाठ थोपटून कुठं कुठं कामाला जुंपतात हे सांगणे काय सोयीचे नाही .
सध्या कोविड -19 ( कोरोना ) च्या प्रदूर्भावमध्ये शिक्षकांची मात्र माकडचेष्टा केली हो . शिक्षक राष्ट्रीय कामाला कधीच विरोध करत नाहीत. पण त्यांना कामाच्या ठिकाणी जी वागणूक दिली जाते ते नकोय . तुमचा मेहनताना दिला जातोय तो चेष्टा करणारा आहे . आता इतिहासात जाऊ .गेल्या दोनतीन वर्षांपूर्वी BLO ची कामे शिक्षकांना दिली गेली होती ,तेव्हा असंच झालेलं . शिक्षकांकडून काम इतर विभागाला दिला(काढले ) आणि इतर डिपार्टमेंटला दिलं तेव्हा भत्ता वाढवला .
शिक्षक पूर परस्थिती मध्ये देखील पंचनामा करायला अग्रेसर होते .तेथे त्यांनी प्रामाणिक पणे काम केलंय. यापूर्वी जनगणना ,खानेसुमारी ,तसेच दारिद्र्यरेषेचा सर्वे तर कितीवेळा केला ? पण शेवटी दारिद्र्यरेषेचा सर्वे शिक्षकांनीच पूर्ण केला. तेव्हा जनतेला आणि शासनाला मान्य झाले . प्रत्यक्ष निवडणुकी ऐवजी blo, वोटिंग कार्ड्स वाटप , मतदार लिस्ट आद्यवत करणे , घरोघरी जाऊन मोबाईल वरून अपडेट करणे .हि कामे अध्यापन सांभाळून करावी लागत होती .हे कुणालाही शक्य नाही .तरीदेखील शिक्षककांनी पूर्ण केले.
कोविड च्या काळात तरी शिक्षकांनी काय काय कामे केली हे काय आता वेगळं सांगायला नको . चेकपोष्ट वर शिपायचं काम केले, क्लार्कचं काम केलं .लॉक डाऊन काळात दारुच्या दुकानासमोर तळीरामांच्या रांगा लावण्याचं काम शाळेतील मुलांच्या रांगा लावण्यासारखं आहे असं समजून काम दिलं. पोलीस बळाचा वापर करून लोक ऐकत नाहीत अशा ठिकाणि शिक्षक प्रामाणिक काम करत होते . हे साऱ्या महाराष्ट्रानं पाहिलं .
तसं राशन दुकानात माल वाटायला शिक्षक . कोविड केअर सेंटर मध्ये देखील शिक्षकांना काम . पेशंटची सोय करण्यापासून ते पेशंटना घरी पोचवण्याच्या कामापर्यंतची जबाबदारीची कामं शिक्षकांनी केली .
काही जिल्हा परिषद मध्ये शिक्षकांनी घरोघरी जाऊन कोविड 19 चा सर्वे देखील केला आहे . महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये कोविड 19 ची परिस्थिती अतिशय गंभीर असताना आणि रोज हजारो रुग्ण सापडत असताना अशा स्थितीत समग्र शिक्षा अभियान अंतर्गत ऑडिट साठी बोलावण्यात आले होते .ऑडिट साठी येणारे मुख्याध्यापक यांचे वय साधारणपणे पन्नास वर्षांवरील आहे त्यांना हृदयविकार ,उच्च रक्तदाब , मधुमेह व अन्य आजार असतात . हे सर्वजण जाणून आहेत .तरीही लेखा परीक्षण कॅम्प लावला होता . सांगलीतून विरोध झाला कोवीडच्या वाढत्या परिस्थितीमध्ये लेखापरीक्षण रद्द करण्यात यावे, अशी मागणी करून लेखा परीक्षण रद्द करावे लागले .....
अशात रोज "तुमचं काय बाबा शाळा बंद पण पगार चालु आहे" , मज्जा आहे.....असं ऐकायला मिळत आहे. कोरोना मुळे शाळा बंद झाल्या lock down सुरु झालं. सर्व जण घरीच होते .काम करत होते ते फक्त डॉक्टर पोलिस आणि काही सरकारी कर्मचारी. अशा परिस्थितीत आणखी एक जण या सर्वांसोबत काम करत होता तो म्हणजे शिक्षक . कढीपत्त्या सारखा जो सगळ्या भाज्यात वापरला जातो; पण खाण्या आधी अगदी अचुट बाजूला केला जातो . पण सगळ्यांसोबतच काम करत होता ... तास दोन तास मोबाईल हातात घेऊन आपल्या शाळेतील मुलांसाठी अभ्यास दिला कि सुरु झाला या शिक्षकाचा दिनक्रम ... कधी तो चेकपोस्ट वर ड्युटीला पोलिस बांधवा सोबत ते पण रात्री बे रात्री. गाड्यांचे नंबर लिहायच काम त्यांच्याकडे. चौकशी करायची . तरीही जत तालुक्यात एका शिक्षकाचा बळी गेला . कधी तो रॅशन दुकानावर भ्रष्ट्राचार थोपवण्यासाठी धान्य वाटपाला गेला. तिथे लक्ष दिलं त्यानं . रेड झोन असला तरी तो इमाने इतबारे जातच होता. कधी रेड झोन मधील लोकांना घरपोच किराणा देण्याच काम देखील त्याला दिलं. स्वतः चा जीव धोक्यात घालून प्रामाणिकपणे त्यानी ते केलं. ज्या परिसरा जवळ कोणी जात नव्हत तिथं तो गेला. या प्रसंगी तर अनेक बांधवांना कोरोना ची लागण झाली .कधी त्याला क्वारंटाइन सेंटर वर पहाऱ्यावर ठेवलं. तिथं ही तो वेळेवर गेला आणि ड्युटी केली. ज्या कोविड सेंटर च्या इमारतीजवळ कोणी जात नव्हत, अशा इमारतीत त्याने काम केलं... कधी तो सर्वे करायला गेला. प्रत्यक्ष घरी जाऊन कोणतीही सुविधा नसताना तो काम करतोय....या आणि अशा अनेक कामात तो मदत करतोय ..सर्व शिक्षक बंधुंना माहीत आहे हे राष्ट्रीय काम आहे. आपणास हे करावेच लागणार आहे शिक्षक पण ते काम इमानदारीने करत आहेत. कुटुंबाची पर्वा न करता दिवस रात्र ते पोलिस डॉक्टर यांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करत आहेत ....
अपेक्षा फक्त एवढीच आहे कि शिक्षक घरी आहेत आणि त्यांची मज्जा आहे हा विचार डोक्यातुन काढुन टाका. शिक्षक देखील कोविड योध्दे आहेत. जीव धोक्यात घालुन ते देखील कोरोनाशी लढत आहे याची जाण समाजाने ठेवावी......
डॉक्टर स्वतःच्या दवाखान्यात स्वतःचा व्यवसाय करून देखील शासनाकडे 50 लाखाचे विमा संरक्षण मागत आहेत .
तरीही शिक्षकाला शासनाने कोविड19(कोरोना) च्या 50 लाखाच्या विमा कवच पासून दूर ठेवले जात आहे .
सद्यस्थितीत देखील शिक्षक कोरोना (कोविड 19 ) रुग्णाच्या सर्वेक्षणा ला जुंपले आहेत . याचं अधिक दुःख आहे.......... .'गरीब बिचारी कुणीही हाका ' अशी अवस्था शिक्षकाची झाली आहे .......!!!!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
#####################################
🙏🙏🙏🙏🙏
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा.
🙏🙏🙏🙏🙏
एखादा ब्लॉग आवडल्यास , पोस्ट वाचताना उजव्या कोपऱ्यात वरील ऑपशन(तीन टिंब ) वर जाऊन आपल्या मित्रांना whatsapp किंवा facebook द्वारे share करु शकता.
🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment