माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Wednesday, September 16, 2020

कांदा उत्पादक; शेतकऱ्यांना - वाली कोण ?

ग्राहकांच्या हितासाठी 

शेतकऱ्यांच्या पोटावर पाय ..........!


 मार्च 2020 पासून संपूर्ण देशात  कोरोनामुळे लोक डाऊन आहे . सर्व उद्योग धंदे  बंद पडण्याच्या मार्गावर आहेत . अजूनही कोरोनाची भीती कमी झालेली नाही .त्यात सारा देश अनलॉक होत आहे .कोरोनाचा कहर अजूनही कमी झालेला नाही .
 रेल्वे, बस,  विमान सेवा बंद आहेत . त्याचा फटका सर्व स्तरावर होत आहे .व्यापारी, दलाल संप करतील ;आणि नुकसान भरपाई सरकार कडून मागून घेतील . पण कोरोनाच्या संकट काळात ज्या शेतकऱ्याने संपूर्ण देशाला जगवलं तो शेतकरी मात्र अजूनही कंगाल आहे .त्याची कर्जातून सुटका होत नाही.  मार्च 2020 पासून  शेतकऱ्यांचा नाशवंत शेतमाल शेतात, बांधावर , घरी , बाजारात सडून नास होऊन जातोय . याची काळजी कुणालाही नाही ; ना खंत ना खेद.  कांद्याला सप्टेंबर मध्ये दर येईल म्हणू चार महान वाट पाहत बसलेले शेतकरी आज खिन्न होऊन बसले आहेत . मरण जवळ करू पाहत आहेत . प्रत्येक  संघटनाना बंद आणि रास्ता रोको करावे लागत आहे
.

   एकतर शेतकऱ्यांना  बँका चटकन कर्ज देत नाहीत , सोसायटी लवकर फिरत नाही , पीककर्ज वेळेवर उपलब्ध होत नाही . पीकविमा मिळेल की नाही सांगता येत नाही .  अशात शासनाने शेकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायला  हवेत . 14 सप्टेंबर 2020 रोजी केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातीवर बंदी घातली;आणि  लासलगाव , चाळीसगाव येथील कांद्याचे लिलाव बंद झाले . संपूर्ण महाराष्ट्रात कांद्याचे दर कोसळले . जवळ जवळ चारशे कंटेनर बंदरावर अडकले आणि सहाशे हून अधिक  वाहने  बाजारसमितीच्या बाहेर अडकून राहिली. याचा तोटा नेमका कुणाच्या माथी थडकणार ? कुणाला ?

     आधीच कोरोनाच्या भीतीने मजूर दुप्पट मजुरी मागू लागले आहेत .एक क्विंटल कांदा उत्पादन करायला  दोन हजार  रुपये उत्पादन खर्च येत आहे .त्या मनाने  कांद्याला दर मिळायला हवा .  खरंतर उत्पादन खर्चावर विक्री किंमत असायला हवी; पण कांदा अजून  हमीभावामध्ये नाही. परंतु कांदा हा नाशवंत शेतीमाल आहे  त्यामुळे या  शेतीमालाला उत्पादन खर्चावर विक्रीकिंमत ठरावता येत नाही .

    तरीही काही शेतकरी कांदा उत्पादन हे आपापल्या जबाबदारीवर घेतात . तेव्हा तरी  त्याला फायदा मिळाला पाहिजे . 

      कांद्याची दरवाढ रोखण्यासाठी  कांदा निर्यातबंदी हा उपाय होऊ शकत नाही . तर निर्यात बंदी करणे  हे  कांदा उत्पादन करू नका असे  सांगितल्या सारखे आहे .

 

शेतकरी आशेने पाहतोय ,म्हणतोय मला रडवू नको ...........

      भारतीय कांद्याला बांगलादेश  आणि इतर देशात चांगली मागणी आहे . शिवाय कांदा हे जीवनावश्यक वास्तूमध्ये समाविष्ट नाही .त्यामुळे कांदा परवडत नसेल तर कांदा खाऊ नये असे शेतकऱ्याने म्हंटल तर कुणाला  राग यायचं करण नाही .

      आजपर्यंत सर्व सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊ म्हणून निवडणूका  लढवल्या जातात  आणि पाच वर्षाच्या काळात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय काही केल्या यशस्वी होताना दिसत नाहीत .


       कांद्याचे बाजारातील भाव वाढले म्हणून जर कांद्याची निर्यात बंदी होत असेल तर  शासनाला केवळ ग्राहकांची काळजी आहे असं म्हणावं लागेल . ग्राहकांच्या काळजीपायी शेतकऱ्यांच्या माथी मरण का ? 

       


#####################################
🙏🙏🙏🙏🙏
 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा.
🙏🙏🙏🙏🙏
  एखादा ब्लॉग आवडल्यास , पोस्ट वाचताना उजव्या कोपऱ्यात वरील ऑपशन(तीन टिंब ) वर  जाऊन आपल्या मित्रांना  whatsapp किंवा facebook द्वारे  share करु शकता.
🙏🙏🙏🙏🙏









No comments:

Post a Comment