श्री अण्णासाहेब भोसले रा.- येळवी,
सेवानिवृत्ती निमित्त बातचीत......!
ता- जत, जि- सांगली. आज दि. 31 मे 2025 रोजी नियत वयोमानानुसार भोसले सरांची सेवानिवृत्ती होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या जीवनाचा घेतलेला आढावा. एक जून 1967 ही सरांची लावलेली सरकारी जन्मतारीख होय. 30 सप्टेंबर 1992 ही सारी अखंड नेमणूक तारीख. सरांचे शिक्षण एसएससी डीएड असून देखील बारावी सायन्स नंतर डीएड हा कोर्स पूर्ण केला. बारावी सायन्स नंतर लवकर नोकरी मिळावी म्हणून, बेळगाव येथे सॅनिटरी इन्स्पेक्टर चा कोर्स केला. तरीही नोकरी मिळाली नाही. दोन वर्षे नोकरी शोधण्यासाठी आणि बेकारी मध्ये गेली.
सरांचे व्याही, जावई, व्याहीचे भाऊ संपूर्ण फॅमिली वकिली करतात. मुलीची ननंद देखील वकिली करतात.
लग्नानंतर पाच वर्षानंतर पहिली मुलगी झाली; पहिल्या मुलीच्या जन्मानंतर नऊ वर्षांनी मुलगा जन्मला. तिचं लग्न झालेले आहे. एक कन्या एलएलबी करून विवाहित आहे. येळवीच्या तलावातून स्वतंत्र पाईपलाईन शेतीसाठी सरांनी केलेली आहे. शेतीमध्ये डाळिंब, ऊस ,मका , तूर इत्यादी नगदी पिके घेतली जातात.
तंत्रज्ञानावर आधारित शेती केली जाते. स्वतःचा 27 एच. पी. सोनालिका ट्रॅक्टर आहे. ठिबक वर शेतीत पिके घेतली जातात. जत तालुक्यातील शेती ही पावसावर आधारित असते. जत तालुका दुष्काळी पट्टा असून देखील भोसले सरांकडून चांगले उत्पन्न काढण्याचा प्रयत्न केला जातो. वडीलार्जित दहा एकर आणि नोकरी कालावधी मध्ये दहा एकर जमीन खरेदी केलली आहे. येळवी गावात खैराव रोडला एक गुंठामध्ये चार व्यापारी गाळे काढलेले आहेत. सध्या शिकून इंजिनियर झाले तरी वीस हजार रुपये पगार मिळतो. त्यापेक्षा एकच मुलगा आहे, त्याने गावी राहून शेतीवाडी केलेली परवडते. असे सरांना वाटते. आता उच्च शिक्षणाने देखील नोकरी नाही; म्हणून सरांनी हा शेतीचा मार्ग निवडला. मुलगा सध्या मंगळवेढा येथे आयटीआय करत आहे.
भविष्यात गावात शेतकरी मॉल सुरू करण्याचा सरांचा मानस आहे.
30 सप्टेंबर 1992 मध्ये नोकरीची सुरुवात झाली. पहिली नेमणूक जि.प. प्राथमिक शाळा, महाडिकवाडी, तालुका- आटपाडी, जिल्हा- सांगली; येथे सरांची नेमणूक झाली. जून 1994 साली जि.प. प्राथमिक शाळा,खैराव ता- जत, जि-सांगली येथे बदली झाली. त्यानंतर सनमडी ,रानमळा (येळवी) , अहिल्यानगर (येळवी) , तांबेवाडी( घोलेश्वर) पुन्हा अहिल्यानगर , पुन्हा सनमडी आणि शेवटी रानमळा(येळवी) येथे सेवानिवृत्ती. नोकरी कालावधीत पदवीधर शिक्षकांच्या साठी शाळा उपलब्ध होतील की नाही या शंकेतून ग्रॅज्युएशन पूर्ण न करता प्लेन प्राथमिक शिक्षक म्हणूनच नोकरी करायचे असं ठरवलं. प्रथम भोसले सरांची नेमणूक ओबीबी या योजनेखाली जिल्ह्यातील सर्व शाळा द्विशिक्षकी करायच्या या हेतूने शासनाने प्रत्येक शाळेवर दोन शिक्षकांची नेमणूक केली.
1995 साली आम्ही भाऊ भाऊ एकत्र होतो ते वेगळे राहिलो;तेव्हा शेतीमध्ये आमच्याकडे डाळिंबीची बाग होती. बायकांना दिवसभराचा खुरपण्याचा पगार दहा रुपये होता. आहे त्या पगारात शेती देखील टिकवायची आणि नोकरीही करायची.
भोसले सरांचा आवडीचा विषय गणित. खैराव यथे सातवीचे वर्ग शिक्षक म्हणून काम करत असताना गणित हा विषय अत्यंत आवडीने शिकवला. इयत्ता पाचवी सहावी सातवी ला देखील गणित विषय शिकवला. बारावी सायन्स असल्यामुळे पाचवी ते सातवी या वर्गासाठी इंग्रजी देखील सरांनी सहजपणे शिकवलेला आहे. बेळगावला एक बारावीनंतर कोर्स केला स्वच्छता निरीक्षक (सॅनिटरी इन्स्पेक्टर) त्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी दोन वर्षे प्रयत्न केले. सॅनेटरी इन्स्पेक्टरची नोकरी मिळाली नाही म्हणून सरांनी डीएड करण्याचा निश्चय केला आणि डीएड चे शिक्षण पूर्ण केले. डी.एड.पूर्ण झाल्यानंतर पडळकरवाडी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे आश्रम शाळेवर सहा महिन्यासाठी नोकरी केली. आणि महाराष्ट्र राज्य निवड मंडळ पुणे अंतर्गत परीक्षा होऊन 1992 साली आटपाडी तालुक्यात नोकरीची सुरुवात झाली.
सत्यजित आवटे नावाचा खैराव शाळेतील विद्यार्थी हा एपीआय (API) झालेला आहे. सध्या आष्टा ,ता - वाळवा. जि- सांगली येथे पोलीस स्टेशनमध्ये तो काम करतो. सरांना कबड्डी, खो-खो या खेळांची आवड आहे. शाळा पातळीवर हे खेळ आवडीने घेतले आहेत.
जिल्हा परिषद सांगली अंतर्गत बौद्धिक स्पर्धांमध्ये एकांकिका स्पर्धाप्रकारामध्ये सलग तीन वर्ष रानमळा शाळेचे विद्यार्थी जिल्हा पातळीवर स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. वसंतदादा सामाजिक सेवाभावी संस्था मार्फत शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार त्याचबरोबर त्या वर्गाला शिकवणारे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचा एकत्रित सत्कार सांगली येथे 2007 साली झाला होता.
पंचायत समिती जत, शिक्षण विभाग यांच्याकडून तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार 2007 साली प्राप्त झालेला आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत येळवी यांच्याकडून देखील आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आलेला आहे. तसेच प्रकाशराव जमदाडे युथ फाऊंडेशन,येळवी या संस्थेकडून देखील तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार सरांना प्राप्त झालेला आहे. खैराव शाळेत असताना शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार सांगली येथे करण्यात आला.
कन्या पल्लवी हिने प्राथमिक शाळेत असतानाच वकील व्हायचं ठरवलेले होते. तिने लॉ पूर्ण केला. सध्या ती सांगोला येथे वकिलीचा व्यवसाय करते. जावई वकील आहेत.व्याही वकील आहेत , व्याहिंचे भाऊ देखील वकील आहेत. मुलीची नंनंद देखील वकील आहे.
सेवकालावधीमध्ये वृक्षारोपण , विद्यार्थ्यांना साहित्य शैक्षणिक साहित्य वाटप इत्यादी चांगली कामे केलेली आहेत. जि.प.शाळा, रानमळा शाळेसाठी जागा आणि इमारत मिळवण्याचे काम सरांनी केलेले आहे. शाळेसाठी उपलब्ध जागा शेतकऱ्याकडून तसेच ग्रामस्थांकडून मिळवण्यासाठी चांगले प्रयत्न केले आणि त्या ठिकाणी सध्या जिल्हा परिषद रानमळा शाळेची इमारत उभी आहे. जिल्हा परिषद शाळा रानमळा ही शाळा पूर्वीचे वॉलेंट्री शाळा होती. ती घरात भरायची परंतु जेव्हा जिल्हा परिषदेकडे वर्ग झाले तेव्हा ग्रामस्थांकडून जागा बक्षिस पत्र करून घेणे. भोसले सर यांनी शाळा बांधकाम , खोल्या बांधकाम करून घेणे हे महत्त्वाचे काम अण्णासाहेब भोसले सरांनी केले. सरांचे आयुष्य निरोगी आहे. दोन भाऊ आणि चार बहिणी असे एकूण सात भावंड आहेत. त्यामध्ये सर्वात लहान आण्णासाहेब हे शिक्षक आहेत. सरांच्या अनेक विद्यार्थी शिक्षक पोलीस सैन्य भरती अशा ठिकाणी काम करतात.
No comments:
Post a Comment