महाराष्ट्रातील शाळा दिवाळीनंतर सुरू होणार .........!
अनलॉक नंतर शाळा सुरू होताना फार घाई न करता आणि धीराने पाऊले टाकायला हवेत ...! नाहीतर ही घंटा शाळेची न ठरता साक्षात मृत्यूची ठरेल ...!
राज्य सरकारने वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे . तज्ज्ञांशी चर्चा करून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे .
तरीही शासनाने आणि स्थानिक प्रशासनाने काही गोष्टींचा गांभीर्याने विचार करायला हवा . त्यासाठी खलील प्रमाणे विचार करता येईल .
कमी धोक्याच्या विभागातील आणि उच्च शिक्षण वर्ग
शाळा सुरू करताना प्रथमतः शाळा कमी धोक्याच्या जागी चालू कराव्या लागतील .प्रथम महाविद्यालयीन वर्ग सुरू करावेत . केवळ 10 वी व 12वी महत्वाचे वर्ष आहे म्हणून 9वी ते 12वी चे वर्ग सुरू केले तर धोका अधिक वाढण्याची भीती आहे . शाळा कोणत्या क्षेत्रात सुरू कराव्यात हे शासनाने अगोदर जाहीर करावे ,जसे की रेड झोन ,शिवाय इतर झोन मध्ये आधी शाळा सुरू कराव्यात .त्याचा परिणाम अभ्यासावा .त्यानंतर इतर झोन मध्ये शाळा हळूहळू सुरू कराव्यात . शहरी भागापेक्षा शाळा ग्रामिण भागात ,कमी लोकसंख्या असलेल्या गावातील शाळा आधी सुरू व्हायला हव्यात .
कोरोना चाचणी आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन
शाळेत येणाऱ्या शिक्षक आणि विदयार्थ्यांना कोरोना चाचणी आवश्यक आहे , हे मान्य आहे परंतु खाजगी ,विनाअनुदानित , शिक्षण सेवक असे शिक्षक या चाचण्या कशा करणार ? या चाचण्या शिक्षकांना कंपल्सरी केल्या आहेत .
शाळेत येणारा प्रत्येक विद्यार्थी दररोज त्याच्या घरून येणार आहे , त्यावेळी संसर्ग आपण कसा रोखणार ? त्याची आपण चाचणी निगेटिव्ह आली तरच त्या विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश देणार आहे. दररोज घरून येणाऱ्या विदयार्थ्यांना आपण कसे नियंत्रण ठेऊ शकतो ? हॉस्टेल वर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील वेगवेगळ्या उपाययोजना वेगळ्या कराव्या लागतील.
शिक्षकांची मानसिकता आणि शासनाचा अधिनियम
खरंतर शिक्षक शाळेत जाऊन शिकवायला तयार आहेतच . ज्या अर्थी कोविड काळात शिक्षकांनी आपत्ती व्यवस्थापनात सरकार ला मदत केली त्या अर्थी शिक्षक शाळेत येऊन शिकवायला घाबरतात असे नाही. परंतु 50% शिक्षक उपस्थितीची अट शासनाने लावू नये .ही अट मागे घ्यावी अथवा शिथिल करावी. 9वी ते 12वी च्या शाळा सुरू करताना जिथे स्वतंत्र व्यवस्थापन व स्वतंत्र इमारत आहे आशा ठिकाणी शिवाय मर्यादित स्टाफ आहे, त्या ठिकाणी शाळा सुरू करणे थोडंफार शक्य आहे .परंतु 8वी ते 12 वी एकच व्यवस्थापन आणि सामायिक इमारत , शिक्षक संख्या अधिक असेल तर त्या ठिकाणी शाळा सुरू करण्यात अडचणी निर्माण होतील . एका बेंचवर एकच विद्यार्थी बसणार आहे . 10 वी 12 वी ची सर्वच मुले शाळेत येण्यास उत्सुक आहेत .कोणाला ये म्हणायचं आणि कोणाला नको ?
ज्या शाळेचा शिक्षक स्टाफ 5 ते 10 पर्यंत आहे तिथं 50 % शिक्षक उपस्थित राहून आपले योगदान देतील .पण ज्या ठिकाणी शिक्षक संख्या 10 पेक्षा जास्त आहे, आधी पासूनच ती शाळा दोन शिफ्ट मध्ये भरते, तिथं स्थानिक पातळीवर शाळा व्यवस्थापन समिती ने निर्णय घेऊन शाळा सुरू केल्या जाणार आहेत . तिथं सोशल डिस्टनसिंग पाळायला अडचणी येऊ शकतील .
पालकांचे मत
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत ,त्यांनी आणि शाळा व्यवस्थापन समिती यांनी शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घ्यायचा आहे . शाळेत विद्यार्थी पाठवण्यासाठी पालकाने संमतीपत्र शाळेला द्यायचं आहे ; म्हणजे पालक शाळा सुरू करण्याला संमती देणार नाहीत ;हे उघड आहे .शाळा सुरू करण्या संदर्भात शासनाला "ट्रायल अँड एरर " या मेथड नुसार शाळा सुरू कराव्या लागतील .
महाविद्यालये सुरू झाल्याखेरीज मला वाटत नाही की 9वी ते 12 वी चे पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठवून देतील . शिवाय शाळा सुरू करण्यापूर्वी आणि शाळा सुरू झाल्यानंतर शाळांनी करावयाच्या उपाययोजना शासनाने खलील प्रमाणे अटी घालून दिल्या आहेत ......
शासनाच्या मार्गदर्शक सूचना
1) शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासह सर्व प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनर असावे.
2) प्रत्येक प्रवेशद्वारावर हॅण्ड सॅनिटायझर बसवावे.
3) शाळेत प्रवेश करण्यापूर्वी गणवेश आणि पादत्राणांचे सानिटायझेशन करावे.
4) गेटजवळ विद्यार्थ्यांची गर्दी होणार नाही, यांचे नियंत्रण करावे.
5) वर्गातील दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे अंतर असावे.
6) वर्ग भरताना शिक्षकांनी सॅनिटायझरचा वापर करून प्रवेश करावा. तसेच मास्क आणि हातमोजांचा वापर करावा.
7) वर्गात तंत्रज्ञानाचा वापर करावा.
8) शाळांमध्ये विलगीकरण कक्ष तयार करावा.
9) बसने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व बस चालकासाठीही नियमावली देण्यात आली आहे.
10) 20 पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र येतील अशा कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करू नये.
11) शाळेतील मध्यान्न भोजन सकाळी 10 ते 1 वेळात विद्यार्थ्यांची गट विभागणी करून द्यावे.
12) स्वयंपाक घरातील कर्मचाऱ्यांनी आरोग्य विषयक व सर्व सुरक्षा उपायांचे पालन करावे.
13) शिकवण्यासाठी रिमोट लर्निंग, ऑनलाइन लर्निंग आणि बेल्डेड लर्निंग या पर्यायांचा वापर करावा.
14) स्वच्छतागृहात गर्दी होणार नाही असे नियंत्रण करावे.
15) स्वच्छतागृहात मुबलक पाणी, साबण, हॅण्डवॉशचा पुरवठा करण्यात यावा.
16) विद्यार्थ्यांच्या तापमानाची रोज नोंद ठेवावी.
17) शाळेत विद्यार्थ्यांचे नियमित परीक्षण व्हावे.
18) शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे स्वच्छतेचे परीक्षण व्हावे.
हि सर्व व्यवस्था उभी कोण करणार आहे ? हे करायला छोट्या शाळांना किमान 25,000 रूपये तर मोठया शाळांना एक लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. व्यावसायिक दराने भरावे लागणारे वीजबील, पाणीबील थकले असताना हा खर्च भागवण्यासाठी आर्थिक मदत जाहीर केलेली नाही.
कोणत्यातरी शाळेला या उपाययोजना शक्य आहेत का ?अनलॉकनंतर माध्यमिक शाळेतील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा मानस शासनाने अधिसूचना काढून व्यक्त केला आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून २३ नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. मुख्यमंत्र्यांच्या अंतरिम मंजुरीनंतर शाळा सुरू करण्यात येतील.
विद्यार्थ्यांच्या बरोबर शिक्षकांच्या आरोग्याचा देखील विचार शासनाला करावा लागणार आहे ....
शाळा सुरू करण्यासाठी सरकार सक्षमपणे विचार करेल . कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून केंद्र व राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करूनच शाळा सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यासंदर्भात पालकांची परवानगी घेऊन आरोग्यविषयक उपाययोजना करून शाळेतील कामकाज करण्यात येईल, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.
संयम पाळा ,कोरोना टाळा.
अति घाई कोरोनाकडे नेई .
#####################################
या लेखात कोविड19 ची परिस्थिती , त्याचे गांभीर्य ,उपाय आणि दक्षता याचा माझ्या दृष्टीने सद्य परिस्थितीचा विचार केला आहे ......!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
एखादा ब्लॉग आवडल्यास , पोस्ट वाचताना उजव्या कोपऱ्यात वरील ऑपशन(तीन टिंब ) वर जाऊन आपल्या मित्रांना whatsapp किंवा facebook द्वारे share करु शकता.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान माहिती लिहिली आहे.
ReplyDeleteखुपचं छान माहिती लिहिली आहे.
ReplyDeleteवास्तव सत्य
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteबरोबर आहे सर
ReplyDeleteShikshakachya manatil prashn mandalet sir
ReplyDeleteसद्य परिस्थितीबाबत छानच विचार
ReplyDelete