माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Tuesday, November 17, 2020

गावच्या सुपुत्रांना "सनमडी गौरव पुरस्कार 2020" ने केले सन्मानित

 



गावाने दिलेली कौतुकाची थाप कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठी असते , पुरस्कारप्राप्त व्यक्तींनी केले मत व्यक्त .

दिवाळी पाडव्यादिवशी  सनमडी ,ता-जत, जि-सांगली येथे गावाच्या सुपुत्रांना "सनमडी गौरव पुरस्कार2020"  ने सन्मानित करण्यात आले .

 आपल्याच भूमीपुत्रांचा आणि सुपुत्रांचा सन्मानचिन्ह ,शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला .विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल , सनमडी गावाशी नाळ जोडली गेली असल्यास ,संघर्ष करून यश मिळवल्यास तसेच गावी राहून परिस्थितीवर मात केलेल्या व्यक्तींना सनमडी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते .

या  समिती मार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे हे  दुसरे वर्ष असून यामध्ये शेती ,संरक्षण ,शिक्षण,वैद्यकीय, प्रशासकीय  सेवा , पशुपालक , बागायतदार , कृषी , बँकिंग ,उद्योगपती , क्रीडा ,शिक्षण क्षेत्रात नैपुण्य मिळवणाऱ्या  व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले .



यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  म्हणून आयकर आयुक्त मुंबई , डॉ.सचिन मोटे तसेच डॉ.कैलास सनमडीकर ,सोलापूर जिल्हाधिकारी चिटणीस मा .श्रीकांत पाटील , हैद्राबादचे गोल्डन मॅन योगेश मोटे,आदर्श इंजिनियरींग कॉलेज प्राध्यापक नारायण खरजे निल-गंगा फायनान्शिअलचे संस्थापक-अध्यक्ष तुकाराम धायगुडे, जत नगरसेवक भुपेंद्र कांबळे  हे प्रमुख उपस्थित होते.




यार्षीच्या विशेष पुरस्कार म्हणून प्रशासकीय सेवेत सोलापूर  जिल्हाधिकारी चिटणीस म्हणून काम करणारे गावचे सुपुत्र मा.श्रीकांत पाटील आणि वैद्यकीय सेवा देणारे ,आणि सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.कैलास सनमडीकर यांना सन्मानित करण्यात आले .

आपल्या मनोगतामध्ये मा .श्रीकांत पाटील म्हणाले की, प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून मार्गदर्शन प्रशिक्षण घेवून गावातील समस्या गावातच सोडवा.गावचे कारभारी म्हणून ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य यांची अनेक वर्षांपासूनची ओळख आहे. कारभाऱ्यांचा कारभार चांगला असल्यास गावचा विकास गतीने होतो. गावातील प्रत्येक नागरिकांनी निर्धार केल्यास आदर्श गाव निर्माण होते.  पुढे श्रीकांतश्रीकांत पाटील म्हणाले की सर्वांगीण विकासासाठी  सर्व ग्रामपंचायत सदस्य , ग्रामसेवक ,पोलिसपाटील व शिक्षक यांनी एकजुटीने निर्धार केल्यास गावाचा कायापालट व्हायला वेळ लागत नाही. राज्यात विकासात आदर्श असलेले राळेगणसिद्धी, हिवरेबाजार, अशा गावांना भेटी दिल्या पाहिजेत. या गावांत राबविलेल्या विकासाचा पॅटर्न आपल्या गावात राबविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे. प्रत्येक सदस्याने शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून आपले वॉर्ड आदर्श केल्यास गाव आदर्श होईल. त्यासाठी निवडून आल्यानंतर गट-तट बाजूला ठेवून पारदर्शीपणे लोकसहभाग घेऊन योजनांची अंमलबजावणी करावी व ग्रामसेवकांच्या माध्यमातून योजनांचा पाठपुरावा करावा.

आयकर आयुक्त डॉ.सचिन मोटे यांनी प्रमुख पाहुणे 

भाषणात म्हणाले की वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधांकडे सर्वांनी लक्ष दिलेच पाहिजे.सनमडी गौरव पुरस्कार समितीने अशा पद्धतीचा पुरस्कार देवून त्यांना भविष्यात काम करण्यासाठी उर्जा देण्याचे काम केले आहे. सकारात्मकता, नि:स्वार्थी, विकासात्मकदृष्टी ठेवून धडपडत राहिल्यास गावचा चेहरामोहरा बदलणे शक्य आहे. गावातील विविध विषयांतील ज्ञानी, नि:स्वार्थी लोकांना एकत्र करून काम केल्यास विकासकामे गतीने करता येतात.



डॉ कैलास सनमडीकर म्हणाले की-

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनात्मक अधिकारामुळे आम्ही आज चांगले शिक्षण घेवू शकलो. शिक्षण हाच मनुष्याच्या विकासाचा पाया आहे . आई अशिक्षित आणि जुजबी शिक्षण घेतलेले वडील यांनी 30 वर्षपूर्वी शिक्षणाचे रोपटे लावले . आज 2500 विदयार्थी सिद्धार्थ शिक्षण संस्थेत शिक्षण घेत आहेत . जिवनात यशस्वी व्यहायचे असेल तर प्रत्येकांनी अगोदर शिक्षण घेणे गरजेचे आहे. पारंपरिक शिक्षणाबरोबर कुठल्याही प्रकारचा खेळ खेळणे आवश्यक असल्याचे सांगितले. आपल्या जीवनात खेळ हा अविभाज्य घटक असून, खेळामुळेच जीवनातील यशापयश पचवण्याची सवय लागते.

 

निल-गंगा फायनांन्शिअल, सांगली चे संस्थापक-अध्यक्ष तसेच पत्रकार मा. तुकाराम धायगुडे हे आपले मनोगत व्यक्त करताना  म्हणाले की, गेल्या वर्षी मला या ठिकाणी सनमडी गौरव पुरस्काराने सन्मानित केले होते. सनमडी गौरव पुरस्कार समितीने चालविलेला उपक्रम हा आम्हाला  काम करणाऱ्यांना बळ देण्याचे काम करत आहे. काही माणसं असतात. जगावेगळं काहीतरी झपाटलेली करून दाखवण्याचा ध्यासच त्यांनी घेतलेला असतो... 



विक्रमाचं क्षितीज त्यांना खुणावत असतं आणि त्यासाठी सगळी ताकद, मेहनत पणाला लावून ते आपलं ध्येय गाठतातच. मूळचे सनमडीचे व सध्या  कळंबोली येथे राहत असलेले पंडित तुकाराम धायगुडे यांनी नोव्हेंबर 2016 साली  मुंबईत २५७ किलो वजनाच्या दोन बाईक लागोपाठ १२२ वेळा आपल्या पोटावरून जाऊ देत त्यांनी विश्वविक्रमाला गवसणी घालत गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. अशा या शुरवीराला सनमडी गौरव पुरस्कार देवून सन्मानित केले याबद्दल आज मला आनंद आहे.

 वैद्यकीय-डॉ.कैलास सनमडीकर (ऑर्थो सर्जन) , प्रशासकीय  सेवा - मा.श्री .श्रीकांत पाटील (सोलापूर  जिल्हाधिकारी चिटणीस ) , त्याच प्रमाणे विविध क्षेत्रात काम करणारे  उदा. आदर्श पिता-श्री यशवंत पाटील , समाजसेवा -मा.श्री भुपेंद्र कांबळे (जत नगरपरिषद,नगरसेवक ) , इंजिनियर -श्री संतोष बाबर (पजिओ), इन्शुरन्स सेक्टर -श्री गुंडोपंत पवार (MDRT ,USA) कृषी - श्री यालगोंडा पाटील , संरक्षण-श्री बाळासाहेब खरात   ,शिक्षण- महादेव कांबळे (अनाथ मुलांचे आईबाप म्हणून सेवा देणारे शिक्षक ) , पशुपालक-श्री सुरेश पवार , बागायतदार -श्री धनंजय कर्ले ,   बँकिंग - श्री  विठ्ठल पाटील( जत अर्बन बँक)  , क्रीडा- श्री वसंत पवार (मुंबई पोलीस ) ,शिक्षण- मा.श्री नरहरी पवार ( संस्थापक चेअरमन सनमडी हायस्कुल)   क्षेत्रात  ,वर्ल्ड रेकॉर्डर पंडित धायगुडे  आणि महिला बचत गट संघटक सौ.शैलजा चिगदूळे  इत्यादी भूमिपुत्रांना गौरवण्यात आले . तसेच समाजसेवा -श्री तुकाराम पाटील  ,उद्योग-रणजित शेटे (अर्णव ऍग्रो,फलटण ) नागेश हुग्गे ( सिंगापूर मर्चंट नेव्ही ) , सौरभ सलगर (NEET Topper) ,तसेच दहावी व बारावी मधील यशवंत  मुलांचा देखील गौरव करण्यात आला .

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहिद जवानांना आणि कोविड 19 मध्ये मृत्यू पावलेल्या भूमिपुत्रांना  श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात झाली . प्रथम कोविड 19 मध्ये प्रभावीपणे काम केलेल्या कोविड योद्धयांचा देखील सत्कार करण्यात आला . नर्स, डॉक्टर, अंगणवाडी ताई, आशा वर्कर आणि त्यांचे सर्व डिपार्टमेंट सहित 17 जणांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले .

"सनमडी गौरव पुरस्कार २०२० " चे हे दुसरे वर्ष असून १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सनमडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर  कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाचे आयोजन   "सनमडी गौरव पुरस्कार समिती " ने केले होते .समितीचे विश्वस्त  श्री अशोक गोरड , श्री सुनिल सनमडीकर ,श्री तुकाराम पाटील , श्री मधूकर नरळे , श्री महादेव पवार , श्री आण्णाराव पाटील , श्री भाऊसाहेब  महानोर, श्री व्यंकटेश नरुटे ,श्री भाऊसाहेब जाहीर ,श्री राजू सलगर , श्री आप्पू पाटील , श्री दिनकर लवटे ,श्री सिद्धू कलगुंडे आणि श्री मलकरी बिराजदार यांनी केले होते .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.श्री .अण्णाराव पाटील यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भाऊसाहेब महानोर यांनी केले तर आभार श्री तुकाराम पाटील यांनी केले .

इतर काही क्षणचित्रे









#####################################
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
या ब्लॉगला फॉलो करा ; की जेणेकरून नवीन लेख पब्लिश झालेची नोटीफिकेशन आपोआप मिळेल.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तसेच ब्लॉगच्या होम पेज वरील कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शन ला जा आणि इतर ब्लॉग वाचा .आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना  whatsapp, facebook द्वारे शेअर करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
  एखादा ब्लॉग आवडल्यास , पोस्ट वाचताना उजव्या कोपऱ्यात वरील ऑपशन(तीन टिंब ) वर  जाऊन आपल्या मित्रांना  whatsapp किंवा facebook द्वारे  share करु शकता.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


 


4 comments:

  1. खूप छाम उपक्रम

    ReplyDelete
  2. खूप छान ब्लॉग आहे...खूप दिवसांनी तुमच्याशी कनेक्ट होता आले..खूप बरे वाटले

    ReplyDelete
  3. I'm trying a little task myself..... Stay on connect with 9421181224

    ReplyDelete