![]() |
उत्सुकता चालू वर्षाच्या उत्सवाची ....... |
केंद्र शासनाशी विचारविनिमय करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाला दिले .
कोरोना साथीमुळे राज्यात अजूनही शाळा ' फेस टू फेस ' सुरु करण्यात आलेल्या नाहीत. नेहमी जूनमध्ये सुरु होणाऱ्या शाळा सुरू झाल्या नाहीत . ऑगस्ट संपून सप्टेंबर जवळ आला तरी शाळा सुरू होण्याची चिन्हे नाहीत . जून ते मे असे शैक्षणिक वर्ष असते. परंतु या वर्षी जानेवारी ते डिसेंबर असे शैक्षणिक वर्ष करता येते का याबाबत केंद्र शासनाशी विचारविनिमय करा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत.
नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात आपल्या वर्षा या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. सदर बैठकीत शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असे करता येईल काय ? असा विचार मांडला गेला .
गेल्या ३ महिन्यांपासून राज्यात सन 2020/21 या शैक्षणिक वर्षाची शिक्षणाला सुरुवात झाली आहे. याबाबत शिक्षण विभाग ऑक्टोबरपर्यंत एकूणच बदललेल्या स्थितीत विद्यार्थी, शिक्षक यांना दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन, ऑफलाईन शिक्षणाच्या फलश्रुतींचा आढावा घेणार आहे असेही शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या. भविष्यात किमान दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तरी प्रत्यक्ष शाळा काही प्रमाणात सुरु करता येतील का यावरही बैठकीत चर्चा झाली. मंत्री गायकवाड यांनी ११ वी प्रवेशाचे काम व्यवस्थित सुरु असल्याचे यावेळी सांगितले. पहिली ते बारावी पर्यंत २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे असेही त्या म्हणाल्या. अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी प्रारंभी ऑनलाईन शिक्षण हळूहळू अंगवळणी पडते आहे असे सांगून पाठ्यपुस्तकेही सर्वांपर्यंत वितरीत झाल्याचे सांगितले.
कोरोना परिस्थितीमुळे सध्या सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. राज्यात काहीही झाले तरी १०० टक्के विद्यार्थ्यापर्यंत ऑनलाईन, ऑफलाईन व जसे शक्य होईल तसे शिक्षण मिळालेच पाहिजे. शिक्षण विभागाने यातील सर्व उणीवा, अडथळे दूर करावे, शिक्षकांची उपस्थिती कशी आहे ते तपासावे, विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात काय अडचणी येत आहेत का ? त्या तत्काळ पहाव्यात असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, नेहमी जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरु होते मात्र सध्याचा काळ पाहता जानेवारी ते डिसेंबर असे शैक्षणिक वर्ष सुरु करता येते का त्याबाबत केंद्राशी विचारविनिमय करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली.
![]() |
विद्यार्थ्यांविना शाळा साऱ्या शांत शांत .......... |
तसं पाहिलं तर ' फेस टू फेस ' शिक्षण जसं होतं तसं ऑनलाईन शिक्षणाला अनेक मर्यादा येत आहेत . सर्वात महत्वाचे म्हणजे मोबाईल उपलब्धी नसणे .त्यानंतर मग अँड्रॉईड मोबाईल ,डेटा ,नेटवर्क , कव्हरेज , उपलब्ध वेळ ,उत्साह ,मानसिकता या साऱ्या गोष्टी येतात .
त्यासाठी मुलांना ' फेस टू फेस ' शिक्षण मिळण्यासाठी चालू शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी साऱ्याच पालकांना वाटतंय की उशिराने का होईना पण जानेवारी ते डिसेंबर असे शैक्षणिक वर्ष चालू केले तर सध्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही .त्या दृष्टीने दहावी आणि बारावीचे पालक या
निर्णयाचे स्वागतच करतील ...........
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
🙏🙏🙏🙏🙏
इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
ला भेट द्या./ ब्लॉगला फॉलो करा.
🙏🙏🙏🙏🙏
एखादा ब्लॉग आवडल्यास आपल्या मित्रांना whatsapp किंवा facebook द्वारे share करु शकता.
🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment