माझे इतर लेख वाचण्यासाठी ब्लॉगच्या होम पेज वर कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शनला जा आणि आपल्या आवडीचा ब्लॉग वाचा. आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना whatsapp, facebook द्वारे शेअर करा. किंवा पेजची लिंक तुमच्या whatsapp ग्रुपला share करा.धन्यवाद.....!

Tuesday, November 18, 2025

कुमार वयापर्यंत मुलांवर संस्कार करताना

 

कुमार वयापर्यंत मुलांवर पालकांनी संस्कार करताना घ्यावयाची काळजी



प्रस्तावना

मुलं म्हणजे समाजाचं भविष्य. एखाद्या राष्ट्राचं खरं सामर्थ्य त्याच्या बालकांमध्ये दडलेलं असतं. जसं झाडाच्या मुळांवर संपूर्ण झाडाची वाढ अवलंबून असते, तसंच बालकांच्या संस्कारांवर त्यांचं भविष्यातील व्यक्तिमत्त्व, वर्तन, आणि चारित्र्य अवलंबून असतं. कुमारवय म्हणजे बालपणातून किशोरावस्थेकडे जाण्याचा टप्पा — या काळात मुलांची शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक वाढ झपाट्याने होत असते. या वाढीच्या प्रक्रियेत पालकांचे संस्कार हे मुलांच्या मनावर खोलवर ठसा उमटवतात. त्यामुळे या वयात योग्य संस्कार देताना पालकांनी अत्यंत संवेदनशील, जागरूक आणि संयमी राहणे गरजेचे आहे.

आजच्या युगात ज्या वेगाने सामाजिक, तांत्रिक आणि नैतिक बदल होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर मुलांवर योग्य संस्कार करण्याचे महत्त्व आणखी वाढले आहे. मुलं इंटरनेट, सोशल मीडिया, आणि डिजिटल माध्यमांच्या प्रभावाखाली वाढत आहेत. त्यामुळे पालकांची भूमिका केवळ आर्थिक पुरवठादार किंवा शिक्षणाचा भार उचलणारी नसून, ती मार्गदर्शक, प्रेरक आणि मूल्यसंवर्धक अशी बनली पाहिजे.


संस्कार म्हणजे काय?

‘संस्कार’ या शब्दाचा अर्थ केवळ धार्मिक किंवा परंपरागत कृती असा नाही. संस्कार म्हणजे मनावर केलेली योग्य छाप. संस्कार म्हणजे  व्यवहारात एखाद्या कृतीवर प्रतिक्रिया देताना अचूक निर्णय घेऊन केलेली कृती करण्याची क्षमता निर्माण होणे. सावकार हे एक दिवसात किंवा एक तासात किंवा तासिकेत करता येत नाहीत. संस्कार ही निरंतर , अखंडित चालणारी प्रक्रिया आहे. संस्कार स्थळ आणि काळ यानुसार बदलू शकतात.त्यासाठी पालकांनी देखील जागरूक राहायला हवे. मुलांमध्ये चांगले विचार, चांगल्या सवयी, नैतिक मूल्ये आणि जबाबदारीची भावना निर्माण करणं म्हणजे संस्कार करणं. संस्कार हे मुलांच्या अंतर्मनात रुजले पाहिजेत. ते शब्दांनी नव्हे तर कृतीतून, अनुभवातून आणि वातावरणातून तयार होतात.

संस्कारांची प्रक्रिया  मानवी जीवनात दीर्घकाळ चालते. ती जन्मापासून सुरू होते आणि वृद्धावस्थेपर्यंत चालते. संस्काराची प्रक्रिया ही कुमारवयापर्यंत सर्वाधिक प्रभावी असते. कारण या काळात मुलं निरीक्षणक्षम, अनुकरणप्रिय आणि प्रभावग्राही असतात. ते  समाजातील तसेच पालकांचे बोलणे, वागणे, वर्तन, अगदी लहान कृतीही अनुकरण करतात. त्यामुळे पालकांनी दिलेले संस्कार हे त्यांच्या संपूर्ण आयुष्याची दिशा ठरवतात.


कुमारवयातील मुलांची वैशिष्ट्ये


कुमारवायतील मुलांना समजून घेण्यासाठी कुमार वयामध्ये जे बदल होतात ते पालकांनी प्रथम समजून घेणे गरजेचे आहे.  कुमारवय म्हणजे मुलांच्या जीवनातील संक्रमणकाळ. या वयात ते बाल्यावस्थेतून किशोरावस्थेकडे प्रवास करतात. त्यांच्या जीवनात  नवनवीन स्वप्ने डोकावत असतात. त्यांच्या मनात अनेक प्रश्न, कुतूहल आणि भावनांचे वादळ सुरू असते.
या काळात काही  बदल घडतात त्या बदलांची वैशिष्ट्ये जाणून घेणे गरजेचे असते. खालील प्रमाणे काही वैशिष्ट्ये दिसून येतात:


शारीरिक बदल: उंची वाढणे, आवाजात बदल, हार्मोन्सचे परिणाम — हे बदल मुलांना गोंधळात टाकू शकतात.

भावनिक चढउतार: राग, आनंद, निराशा, असूया, स्पर्धा, स्वाभिमान यासारख्या भावनांचा तीव्र अनुभव येतो.


स्वत:चा शोध: “मी कोण?” “माझं मत काय आहे?” असे प्रश्न मुलं स्वतःला विचारू लागतात.


सामाजिक ओळख: मित्रांचा प्रभाव वाढतो. ते स्वतःला समूहात सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात.


स्वातंत्र्याची इच्छा: पालकांपासून काहीसा वेगळेपणा दाखवण्याची प्रवृत्ती निर्माण होते.

या सर्व टप्प्यांत पालकांनी जर संयम, समजूत आणि प्रेमाने मार्गदर्शन केलं, तर मुलं सकारात्मक दिशेने वाढतात. पण जर दुर्लक्ष, राग, किंवा दडपशाही केली गेली, तर मुलं हट्टी, गोंधळलेली किंवा नकारात्मक विचारांची होऊ शकतात.


संस्कार प्रक्रियेत  पालकांची भूमिका

पालक हे मुलांचे पहिले शिक्षक असतात. मुलं शाळेत जाण्याआधीच त्यांनी जग पाहण्याचा दृष्टिकोन पालकांकडून घेतलेला असतो. पालकांनी संस्कार करताना खालील गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे:


१. प्रेम आणि सुरक्षिततेचे वातावरण

मुलांना घरी प्रेम, आपुलकी आणि सुरक्षिततेची भावना मिळाली पाहिजे. भीतीच्या वातावरणात वाढणारी मुलं कधीच आत्मविश्वासू बनू शकत नाहीत. प्रेम देणे म्हणजे फालतू लाड करणं नाही, तर त्यांच्या भावना समजून घेणं आणि त्यांच्या भावनांचा आदर करणं होय.

२. संवादाचे महत्त्व

पालकांनी मुलांशी नेहमी खुला संवाद ठेवला पाहिजे.त्यांनी ऐकलेल्या काही गोष्टींची सत्यता त्यांना पडताळून पहावीशी वाटते. त्यामुळे कोणत्याही घटनेची एक बाजूने विचार करण्याची शक्यता असते.तेव्हा  आपण पालक म्हणून “काय झालं?” “ तुला कसं वाटतंय?” असे प्रश्न विचारणे, आणि त्यांच्या उत्तरांना गांभीर्याने ऐकणे, हे महत्त्वाचे आहे. संवादातून विश्वास निर्माण होतो, आणि तोच संस्काराचा पाया आहे.


३. आदर्श वर्तन दाखवणे

पालक स्वतः जे बोलतात तेच जर त्यांच्या कृतींमध्ये दिसलं, तर मुलांवर त्याचा खोल परिणाम होतो. उदाहरणार्थ, पालकांनी प्रामाणिक राहून, इतरांचा आदर करून, वेळेचं पालन करून, वाचनाची आवड दाखवून मुलांना प्रेरित करावं.


४. शिस्त आणि स्वातंत्र्य यांचा समतोल


अति शिस्त मुलांना बंडखोर बनवते, तर अति स्वातंत्र्य त्यांना दिशाहीन करू शकतं. म्हणून दोन्हींचा समतोल राखणे आवश्यक आहे. नियम असावेत, पण ते का आहेत हे समजावून सांगणेही महत्त्वाचे आहे.


५. तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर शिकवणे

आजच्या काळात मोबाइल, इंटरनेट आणि सोशल मीडियाशिवाय मुलं राहत नाहीत. त्यांना पूर्ण बंदी घालण्यापेक्षा जबाबदारीने वापर कसा करायचा हे शिकवणे हा खरा संस्कार आहे.


६. मूल्यसंस्कार आणि नैतिक शिक्षण

सत्य, प्रामाणिकपणा, आदर, सहकार्य, आणि पर्यावरणाची काळजी — ही मूल्यं बालपणात रुजली पाहिजेत. मुलांना दैनंदिन जीवनात या मूल्यांचा उपयोग कसा होतो, हे अनुभवातून शिकवावे.


७. स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे

पालकांनी आपल्या रागावर, तणावावर नियंत्रण ठेवावं. कारण मुलं पालकांची मनःस्थिती ओळखतात आणि त्यावरून वागतात. रागाऐवजी समजावून सांगणं अधिक परिणामकारक असतं.


संस्कार करताना घ्यावयाची काळजी

संस्कार देताना पालकांनी काही महत्त्वाच्या बाबींची काळजी घ्यावी, अन्यथा चांगल्या हेतूने दिलेले संस्कारही विपरीत परिणाम करू शकतात.

१. दडपशाही टाळा

अति नियंत्रण, ओरड, किंवा शिक्षा मुलांच्या मनात भीती आणि विरोध निर्माण करते. मुलं मग खोटं बोलू लागतात किंवा स्वतःला दडपून टाकतात.

२. तुलना करू नका

“पाहा, शेजारचा मुलगा किती अभ्यास करतो!” अशा तुलना मुलांच्या आत्मसन्मानावर घाव करतात. प्रत्येक मुलं वेगळी असतात. त्यांची गती, आवड, आणि क्षमता ओळखणं हे पालकांचं काम आहे.

३. ऐकण्याची सवय लावा

संस्कार म्हणजे फक्त शिकवणं नव्हे, तर ऐकणंही आहे. मुलं काय विचार करतात, त्यांना कोणती अडचण आहे, हे जाणून घेतल्याशिवाय योग्य संस्कार होऊ शकत नाहीत.

४. अति अपेक्षा टाळा

पालकांनी आपल्या अपूर्ण स्वप्नांची पूर्तता मुलांमार्फत करण्याचा प्रयत्न करू नये. त्याऐवजी मुलांना त्यांच्या आवडीनुसार वाढण्याची मुभा द्यावी.

५. समाज आणि शाळेच्या वातावरणाशी समन्वय

मुलं घराबाहेर जाऊन इतर प्रभावात येतात. त्यामुळे पालकांनी शिक्षकांशी आणि मित्रपरिवाराशी संवाद ठेवावा, जेणेकरून मुलांबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.


मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काही उपयुक्त मार्ग

संवेदनशील वाचन आणि गोष्टी सांगणे – गोष्टींमधून मुलांना मूल्यसंस्कार सहज रुजवता येतात.

सामाजिक कार्यात सहभाग – गरजू लोकांना मदत करणे, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिमा यामध्ये सहभाग घेऊ द्या.

कुटुंबीयांसोबत वेळ घालवणे – जेवणावेळी, प्रवासात किंवा खेळताना संवाद साधा.

क्रीडा आणि सर्जनशीलता वाढवणे – शारीरिक आणि मानसिक संतुलनासाठी हे आवश्यक आहे.

धार्मिक/आध्यात्मिक वातावरण – प्रार्थना, ध्यान, किंवा चांगल्या विचारांची चर्चा यामुळे मन स्थिर होते.


आजच्या काळातील आव्हाने

आजच्या डिजिटल युगात संस्कार देणं सोपं नाही. सोशल मीडिया, जाहिराती, स्पर्धात्मक शिक्षण व्यवस्था — या सर्व गोष्टी मुलांवर प्रचंड दबाव आणतात. अशा वेळी पालकांनी “संस्कार” म्हणजे बंधन नव्हे, तर दिशा हे मुलांना समजावून सांगणं आवश्यक आहे.

तसेच, दोन्ही पालक नोकरीत असतील तर वेळेअभावी मुलांशी संवाद कमी होतो. पण “गुणवत्ता” असलेला थोडा वेळही पुरेसा ठरू शकतो — जर तो मनापासून दिला गेला, तर.


संस्कारांचा परिणाम

योग्य संस्कार मिळालेली मुलं पुढे आत्मविश्वासू, जबाबदार, सहानुभूतिशील आणि समाजाभिमुख नागरिक बनतात. ते यश आणि अपयश दोन्हीला समतोलाने स्वीकारतात. उलट, चुकीच्या संस्कारांनी वाढलेली मुलं आक्रमक, अस्थिर किंवा स्वार्थी बनू शकतात. म्हणूनच संस्कार हे समाजाच्या पाया आहेत.


निष्कर्ष

कुमारवय हे मुलांच्या आयुष्यातील सर्वात नाजूक आणि निर्णायक टप्पा आहे. या काळात दिलेले संस्कार हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा घडवतात. म्हणूनच पालकांनी प्रेम, संयम, संवाद, आदर्श आणि समजूत या पाच स्तंभांवर आपले पालकत्व उभे करावे. संस्कार म्हणजे शिकवण नव्हे — तर जपणूक आहे. योग्य संस्कार हे फक्त मुलांचेच नव्हे, तर संपूर्ण समाजाचे भविष्य उज्ज्वल करतात.



Monday, August 25, 2025

विटा ते जत - व्हाया करगणी (तळेवाडी ) खो खो ची आठवण.

विटा ते जत - व्हाया करगणी

( तळेवाडी )

मी श्री भाऊसाहेब दत्तू महानोर जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा काराजनगी, तालुका -  जत, जिल्हा -  सांगली.

 दि. 17 ऑगस्ट 2025 रोजी देविखिंडी तालुका- खानापूर जिल्हा  - सांगली या ठिकाणी  द अम्युचर खो खो असोसिएशन सांगली आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर क्रीडा मंडळ भिकवडी यांच्या संयुक्त विद्यमाने  स्पर्धा आयोजित केल्या होत्या. मा.श्री. अमोल (भैया) बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवीखिंडी  ता - खानापूर या शाळेच्या विकास कामाच्या आणि खो खो क्रीडांगणाच्या उद्घाटन समारंभ बद्दल या स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

 14 वर्षे वयोगटाखालील किशोरी गटातील मुलींच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेसाठी सुळकाई प्रतिष्ठान विटा या संघातून आम्ही जत तालुक्यातून सहा मुलींचा समावेश केला होता.  सांगली जिल्ह्यात प्रथमच सहा पाट्यामध्ये हा खो खो चा खेळ रंगणार होता.  त्यामुळे आयोजक खेळाडू आणि संघ व्यवस्थापक आणि मार्गदर्शक या सर्वांनाच उत्सुकता होती. अलटीमेट पद्धतीने हे सामने प्रथमच होत होते.  ह्या स्पर्धेसाठी मागील वर्षाच्या जिल्हा अजिंक्यपद आणि निवड चाचणी मध्ये असलेल्या क्रमवारीतील संघांनाच  निमंत्रित केले होते. या निमंत्रित संघांमध्ये किशोरी गटाच्या सामना हा देवीखिंडीमध्ये मा. सुहास (भैया) बाबर , खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ आमदार यांच्या शुभहस्ते उद्घाटनाने झाला.  

पहिला सलामीचा सामना राजमाता अहिल्यादेवी क्रीडा मंडळ  भिकवडी आणि  सुळकाई प्रतिष्ठान  विटा यांच्यामध्ये हा सामना झाला. मा.  सुहास (भैया)  बाबर आमदार यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक  करून या खो-खो च्या सामन्याची सुरुवात झाली.  

 राजमाता अहिल्यादेवी होळकर क्रीडा मंडळ भिकवडी च्या मुली सहजच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या असल्यामुळे त्यांना सामान्य संघा बरोबर खेळणे फार कठीण जात नव्हतं.   तरी देखील जतच्या काराजनगी शाळेतून दुष्काळी भागातून आम्ही सुळकाई प्रतिष्ठान विटा या संघामार्फत खेळलो. 

सुळकाई संघाने प्रथम आक्रमण करत राजमाता संघाचे चार संरक्षक  बाद केले.दुसऱ्या पाळीत राजमाता संघाने आक्रमण करत 14 गुण मिळवले. दुसऱ्या आक्रमणाच्या पाळीत सुळकाई संघाने सहा  गुण मिळवले.

 हा सामना राजमाता अहिल्यादेवी होळकर क्रीडा मंडळ भिकवडी यांनी एक डाव चार गुणांनी  जिंकला. 


 सुळकाई प्रतिष्ठान  विटाने  संघाने हा सामना जरी हरला असला तरी देखील खेळाडूंनी चांगली चिकाटी दाखवली.  आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढा दिला. मी माझ्या  खेळाडूंवर खुश होतो. माझे मित्र श्री .अशोक काळे आणि लक्ष्मण बोत्रे उर्फ टायसन भैय्या यांनी  देखील खेळाडूंचे कौतुक केले. खेळामध्ये झालेली प्रगती ,आणि कमी फाऊल्स याबद्दल समाधान व्यक्त केले.त्यानंतर पुढील सामने सुरू झाले. परंतु राजमाता क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक माननीय समीर माने  सर जेव्हा  पुन्हा  आम्हाला भेटल्यावर म्हणाले की  सुळकाई बरोबर झालेल्या सामन्याप्रमाणे आम्हाला पुढचा कोणताही सामना कठीण  गेला नाही.  यावरून सुळकाई प्रतिष्ठान  संघाच्या मुलींची  जिद्द,  चिकाटी आणि सातत्य हे लक्षात येते. 

 सामन्याच्या ठिकाणी आयोजकाकडून सर्व खेळाडूंना आणि कोच यांना  खेळाचे किट देण्यात आले होते.  त्यामुळे सामन्याची दिखावट (लूक)  उत्कृष्ट झाली होती. शाळेचे क्रीडांगण एकदम सुंदर रित्या तयार केले होते. शिवाय शाळेत या व्यतिरिक्त बाला पेंटिंग (BALA PAINTING) आणि वर्गातील फर्निचर हे देणगीदारांकडून केले होते.  अमोल शेठ माने यांच्या दातृत्वाने शाळेच्या विकासाचा हा पाया चांगल्या पद्धतीने रचला होता. शाळेचे मुख्याध्यापक श्री धनाजी घाटगे यांच्या प्रत्नातून साकार झाले होते.  कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये  किट वाटून झाले.  सर्व सहभागी खेळाडूंना आणि शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना देखील किटचे वाटप करण्यात आले होते.  दुपारी विद्यार्थ्यांना जेवणाची सोय देखील केली होती.  त्याचबरोबर स्वीट म्हणून बर्फी वाटप केले होते.

पुरी , भात आणि भाजी असं रुचकर जेवणाचा हे आनंद विद्यार्थिनींनी घेतला. 

 सुळकाई  प्रतिष्ठान  विटाच्या संघामध्ये आम्ही जतहून सहभागी झालेल्या खेळाडूंना परत जतला यायचे असल्यामुळे आम्ही दुपारी तीन वाजताच पुढचे सामने पाहणे सोडून आम्ही जतला निघण्यासाठी निघालो. 

प्रियांका माने आणि राजेश निकम सर यांनी आम्हाला विटेपर्यंत येण्यासाठी सहकार्य केले. त्याचबरोबर मंडले सर आणि मंडले मॅडम यांनी आमच्या खेळाडुंना  विटा स्टॅन्ड पर्यंत लवकर पोहोचवण्यास मदत केली.  त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. मंडले मॅडमनी सर्व मुलींना कॅडबरी दिली.  आम्हाला विटा मधून साडेचार वाजताची सातारा विजापूर ही बस मिळाली आणि आम्ही बसमध्ये बसलो. बस साताराहून फुल्ल आली होती.  त्यामुळे बसमध्ये चढल्यानंतर आमच्या खेळाडूंना बसण्यासाठी जागा मिळाली नाही. मी खेळाडूंना बोललेलो की जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी तुम्ही ऍडजेस्ट व्हा.  मी सर्वप्रथम  चढून एक शीट पकडली आणि इतर मुलीला एक जागा, एवढी जागा आम्हाला  मिळाली.  बाकीच्या पाच उभे राहिल्या. मी माझ्या सीटवर बसल्यानंतर जेव्हा बस सुरू झाली तेव्हा आमच्या खेळाडूंना जवळ बोलावलं आणि तीन मुलींना माझ्या सीटवर बसवून मी उभा राहिलो.  माझ्या शेजारी  बसलेल्या गृहस्थांनी  विचारले  " कुठे गेला होता?"  आम्ही सविस्तर सांगितले. त्यांना  आनंद झाला.  "तुम्ही जतहून आलात का , खो खो खेळायला ?"  कसं काय ? या प्रश्नाचे उत्तर मी स्पष्टपणे देऊ शकलो नाही.  परंतु त्यांना विशेष वाटलं.  

जत मधून खानापूर तालुक्यात या  मुली खेळायला येतात.  आणि माघारी जातात याचं त्यांना विशेष कौतुक वाटलं असावं.  त्यानंतर त्या गृहस्थांनी उठून उरलेल्या दोन मुलींसाठी जागा दिली.  आम्ही दोघेही उभे राहिलो.  चार मुली त्या सीटवर बसल्या.  पुढे दोन मुली एका ठिकाणी ऍडजेस्ट झाल्या.  माझे पाय दुखत असल्यामुळे मी एका मुलीला उठवलं आणि सीटवर बसलो. चौथ्या मुलीला पुन्हा मी मांडीवर घेऊन बसलो.  सफिया नदाफ चॉकलेट खात होती. मी  तिला म्हटलं की , या साहेबांनी आपणाला जागा दिलेली आहे. तर यांच्यासाठी एक चॉकलेट दे.  सफियाने त्या साहेबांना एक चॉकलेट दिले.  

सफिया मला म्हणाली, " सर तुम्हाला देऊ का?"  

मी म्हणालो, "नको, तेही त्यांनाच दे."

ते दुसरेही चॉकलेट त्या साहेबांना दिले.  इतके होईपर्यंत विट्यातून बस रेणावी पार करून खानापूर बस स्थानकावर आली.

 कंडक्टरने येथे बस 25 मिनिटे थांबेल अशी सर्व प्रवाशांना सूचना दिली.  काही प्रवासी चहा नाश्ता साठी खाली उतरले. तेव्हा आम्हाला जागा दिलेले प्रवासी  त्यांची बॅग त्यांनी घेतली आणि उतरून ते खाली गेले.  बस सुरू झाली.

आम्ही सर्वजण आमच्या सीटवर आणि मोकळ्या झालेल्या सीटवर जागा पकडून मुली निवांत बसल्या होत्या.  

 बेणापूर सुलतानगादे आले तेव्हा ते गृहस्थ पुन्हा बस मध्ये आम्हाला दिसले. ते आले तेव्हा त्या ग्रहस्थानी मुलींच्या हातात एकेक पाकीट दिले.  त्यामध्ये वडापाव होता. शिवाय   चार पाण्याच्या बॉटल ही होत्या. त्यांनी प्रत्येक मुलींच्या हातामध्ये एक एक पाकीट दिले आणि दोन मुलींमध्ये एक पाण्याची बॉटल दिली. 

 आम्ही "हे कशासाठी ? का असं?" विचारपर्यंत पुढे भिवघाट हा स्टॉप आला. ते म्हणाले, मी इथं उतरणार आहे. आम्हाला इतकंच कळले की, ते इंजिनियर होते. आखाती देशामध्ये की सौदीमध्ये इंजिनिअरचं  काम करतात. त्यांचं मूळ गाव तळेवाडी.  करगणी जवळ आहे.  त्यांचे वडील घरी एकटेच असतात.  वय वर्ष 80  वर्षे. प्रत्येक दोन महिन्यातून पंधरा दिवसांची रजा काढून ते आपल्या वडिलांकडे भेटायला येतात.  ते स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून काम करतात.  त्यांना मुलींच्या आणि खेळाडूंच्या बद्दल आस्था  वाटली म्हणून त्यांना एक  फुलाची पाकळी किंवा एक सहानुभूतीची जाणीव म्हणून त्यांनी खेळणाऱ्या मुलींचे साठी एक नाष्टा आणि पाण्याची बॉटल हे मनापासून  मुलींना दिले. परंतु आम्ही या गदारोळामध्ये त्यांचं नाव विचारायचं  विसरून गेलो.  इतक्यात  स्टॉप आला.  कंडक्टरने बस थांबण्याची बेल वाजवली.  ते ग्रहस्थ आधीच उभे राहिले असल्यामुळे पटकन बसमधून खाली उतरले आणि निघून गेले.


 पुन्हा बस सुरू झाली आणि माझ्या डोक्यामध्ये विचार चक्र सुरू झाले.  माझ्या नजरेमध्ये फक्त त्यांचा पिवळा शर्ट आणि  जीन पॅन्ट,  स्वच्छ चेहरा आणि पाठीला अडकवलेली सॅक  इतकच मी त्यांच्या पाठमोरे आकृतीकडे बघत राहिलो.  मी विचारात मग्न  झालो. त्या गृहस्थाला  असं का वाटलं  असेल?  त्यांनी आमची किरकोळ चौकशी केली.  फक्त जत मध्ये कोणत्या शाळेच्या आहात इतकच विचारलं. कधीपासून खेळता ?  कसं खेळता? तुम्हाला कोण शिकवतं?  ह्या गोष्टींची आम्हाला कोणतीही चौकशी न करता त्यांनी सर्व मुलींना नाष्टा आणि पाण्याची सोय त्यांच्या मनापासून केली.  का केले असेल?  आणि पुन्हा मनाला वाटलं की अशा अनेक दानशूर व्यक्तींच्या मुळे असे अनेक विविध खेळ जिवंत आहेत.  आपली ही काला देखील जिवंत आहे.  मी त्यांचा फोन नंबर घेऊ शकलो नाही .  त्यांचं नावही विचारू शकलो नाही ही माझ्या मनामध्ये खंत अजूनही कायम राहून गेली आहे. या लेखाच्या द्वारे त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचावा आणि त्यांच्या भावनिक बंधनातून मुक्त व्हावं ही माझी इच्छा. 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
  या ब्लॉगच्या होम पेज वरील कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शन ला जा आणि इतर ब्लॉग वाचा .आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना  whatsapp, facebook द्वारे शेअर करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
 भविष्यात इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
या ब्लॉगला फॉलो करा ; की जेणेकरून नवीन लेख पब्लिश झालेची नोटीफिकेशन आपोआप मिळेल.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  एखादा ब्लॉग आवडल्यास , पोस्ट वाचताना उजव्या कोपऱ्यात वरील ऑपशन(तीन टिंब ) वर  जाऊन आपल्या मित्रांना  whatsapp किंवा facebook द्वारे  share करु शकता.किंवा आपल्याला आलेली  लिंक शेअर/फॉरवर्ड करा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तुमच्या मनातील भावना लेखाद्वारे प्रसिद्ध करायचे असल्यास तरीही संपर्क करा तुमच्या भावनांना कथांना लेखाद्वारे प्रसिद्धी देऊ  .......!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
संपर्क 9421181224
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏



Tuesday, July 08, 2025

आमचं गाव आमची परंपरा - खैराव

 आमचं गाव आमची परंपरा - खैराव


सकारात्मक ऊर्जेचे गाव खैराव


शिवकालीन काळात या गावच्या परिसरामध्ये खैराची झाडे भरपूर होती. खैराची झाडे प्रचंड प्रमाणात असल्याने हे गाव प्राचीन काळात "खैरवन" म्हणून परिचित होते.खैरवन या शब्दाचा अपभ्रंश होऊन खैराव हे नाव पडलेले आहे..!!

परिसरातील खैराच्या झाडा पासून कातनिर्मिती, औजारे व शस्त्राला वापरण्यात येणाऱ्या मूठी बनवण्यासाठी खैराच्या झाडाचा वापर होत असे.

        महाराष्ट्र राज्यातील सोलापूर व सांगली जिल्ह्याच्या सीमेवर सांगली जिल्हयातील जत तालुक्याच्या ईशान्य दिशेला चोवीस कि.मी.अंतरावर हे गाव वसले आहे. गावचा स्थान कोड क्रमांक ५६८८५३असा आहे.

गावामध्ये विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. या गावचे क्षेत्रफळ "२२९१" हेक्टर असून २०११च्या जनगणनेनुसार या गावात ३४७ कुटुंबे राहत आहेत. गावची एकूण लोकसंख्या सुमारे १९६३ इतकी आहे. गावच्या नैऋत्य- ईशान्य दिशेने एक पाण्याचा ओढा वाहत आहे.

तर गावच्या वायव्य दिशेला एक छोटे पाझर तलाव आहे. खैराव गावचा पिन कोड नंबर ४१६४०४असा आहे.



ग्रामपंचायत 







खैराव गावची ग्रामपंचायत स्थापना १९५६ साली झाली असून सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक यांच्या मदतीने गावचा विकास केला जात आहे.


महालिंगराया मंदिर 









पुरातन काळापासून खैराव गावचे ग्रामदैवत म्हणून महालिंगराया देवाला लोक आपले आराध्य दैवत मानतात.  या देवस्थानची जमीन १८ हेक्टर असून येथील पुजारी देखभाल करतात. महालिंगराया देवाची यात्रा वर्षातून दोनवेळा भरते.  गावातील भाविक देवाची पालखी घरी नेऊन आपल्या दारात जत्रा साजरी करतात. महालिंगराया हा भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा देव आहे. अशी लोकभावना व आख्यायिका आहे. 


हनुमान मंदिर 


खैराव गावच्या वेशीतच भव्यदिव्य असे हनुमान मंदिर आहे. मंदिराचा अलीकडेच जिर्णोद्धार ग्रामस्थांनी केला असून मंदिरावर ४१ फूट उंचीचे नेत्रदीपक असे शिखर बांधले आहे. मंदिरासमोरच नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वर माऊलीचा अखंड हरिनाम सप्ताह गेली २४ वर्ष सुरू आहे. गावातील मुंबई, पुणे, नाशिक  शिवाय महाराष्ट्रात जिथे जिथे नोकरी व व्यवसाय निमित्त बाहेर असणारी सर्व लोक या सप्ताहास येतात. प्रवचन, हरिपाठ, किर्तन व भजन इत्यादी कार्यक्रमामुळे गावातील वातावरण आध्यात्मिक होऊन जाते. काल्याच्या सुश्राव्य किर्तनाने सप्ताहाची सांगता होते.






मरी माता मंदिर 


 

मरीमाता देवीची यात्रा आषाढ महिन्यात भरते. या यात्रेत पालखीची मिरवणूक भक्तगण काढतात. पालखीच्या समोर पोतराज देवीची गाणी हलगीच्या तालावर म्हणून नाचतात. देवीला आंबील बोण्याचे नैवेद्य दाखवतात. 


मज्जिद

खैराव गावामध्ये भव्यदिव्य अशी मुस्लिम धर्मांची मज्जिद एक प्रार्थना स्थळ आहे. मोहरम हा इस्लामिक धर्माचा  कार्यक्रम गावामध्ये साजरा केला जातो. धाकली खतल व थोरली खतल असे दोन ते तीन दिवस कार्यक्रम चालतो. सर्व हिंदू मुस्लिम एकत्र येऊन खैराव गावामध्ये मोहरम व रमजान सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. या ठिकाणी नमाज पठण करण्यासाठी अनेक भागातून मौलवी येत असतात. हिंदू मुस्लिम ऐक्याची खूप मोठी परंपरा खैराव गावाला लाभली आहे.





लोककला 










खैराव गावात भजनी मंडळ आहे. त्याचबरोबर धनगरी ओवीकार मंडळ व वालगीमंडळ ही या गावात आहे. महालिंगराया देवाच्या यात्रे दिवशी ओविकार मंडळ आपल्या वाद्यासह गजी नृत्य हे पारंपारिक नृत्य ढोल कैताळ  आणि सनईच्या  मधुर आवाजात सादर करतात. 


शैक्षणिक, क्रीडा व आरोग्य सुविधा.










खैराव गावामध्ये जिल्हा परिषदेच्या दोन शाळा असून घुटुकडेवाडी येथे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. तर गावामध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत वर्ग आहेत.  गावातच श्री संत भिमदास करांडे महाराज माध्यमिक विद्यालय आहे. या विद्यालयात इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग आहेत. गावांमध्ये सर्व शाळा गुणवत्ता पूर्ण शिक्षण देत आहेत.


आरोग्य










आरोग्य सेवा गावात खाजगी दवाखाना असून मेडिकल देखील आहे. आरोग्य सेविका व आशा वर्कर्स यांच्यामार्फत आरोग्याची सेवा दिली जाते. 


क्रीडा








क्रीडा क्षेत्रामध्ये खैराव गावातील अनेक तरुणाने प्राविण्य मिळवले आहे. त्यामुळे ते सैन्य व पोलीस दलामध्ये सेवा बजावत आहे. 




प्रमुख पिके 









येथील जमीन काळी कसदार व माळरान आहे. येथील शेतकरी ज्वारी, बाजरी, गहू, मका, मटकी , तुर,हरभरा,उडीद इत्यादी पिके घेतात. अलीकडे म्हैसाळ जलसिंचनाचे स्रोत निर्माण झाल्यामुळे शेतकरी ऊस , आंबा , केळी, द्राक्ष व डाळींब लागवड करू लागले आहेत.

           

             

           लोक जीवन

खैराव गावचे लोक बहुदा शेतकरी व कष्टकरी वर्गातील आहेत.दुष्काळी पट्ट्यातील गाव असल्याने सहा सहा महिने ऊस तोड मजूर म्हणून वाळवा, इस्लामपूर व कोल्हापूर या ठिकाणी ऊसतोड कामगार व शेतमजूर म्हणून काम करतात. येथील लोकांचे साधे जीवन असून जेवणामध्ये ज्वारी, बाजरी व गहू इत्यादीचा वापर करतात. भाजीपाला व मटकी, मूग व तूर यांचा वापर करतात. राहणीमान सर्वसाधारण आहे. कष्टाने शेती करतात. शेतीला जोडधंदा म्हणून पशु पालन व कुक्कुटपालन करतात. गावात  सहा दुध डेअरी असून पशुखाद्य डेअरी मार्फत शेतकऱ्यांना  उपलब्ध केले जाते. आठवड्याला दुधाचे पैसे मिळतात. गावात आठवडा बाजार मंगळवारी भरतो.भाजीपाला, माळवे इतर संसार उपयोगी साहित्य लोक बाजारात खरेदी करतात. सण समारंभात लोक एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम येथील लोक करतात.अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे .


अधिकारी व कर्मचारी यांचे गाव





येथील अनेक तरुण महाराष्ट्र लोकसेवा स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन अधिकारी झाले आहेत. तर अनेक तरुण सरळ सेवेची परीक्षा देऊन कर्मचारी म्हणून भरती झाले आहेत.

यामध्ये सहाय्यकआयुक्त, मुंबई. महानगरपालिका १. व सहाय्यक आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका. १ उपसंचालक आरोग्य मंत्रालय मुंबई. १पोलीस निरीक्षक सीबीआय पुणे .१ पोलीस उपनिरीक्षक .मुंबई २. मंत्रालय कक्षअधिकारी २ .आयटी इंजिनियर २. बँक शाखाअधिकारी १. पोलीस कर्मचारी १५. महसूल कर्मचारी १. सार्वजनिक बांधकाम विभाग १. वनरक्षक २. सैन्यदल २०. शिक्षक १४. आरोग्य सेवक २. होमगार्ड २. खाजगी ड्रायव्हर१२५ इत्यादी अधिकारी कर्मचारी गावच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यास मोठे योगदान देतात त्यांची प्रेरणा घेऊन अनेक तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत व शासकीय सेवेत जाण्यासाठी प्रयत्नवादी आहेत. *

सकारात्मक ऊर्जेची व ज्ञानाची खाण, संस्कृतीचा मान, विचाराची आण, श्रधेच ध्यान, लोकभावनेचा प्राण, अस आमचं खैराव! आमची आण, बाण, शान!! 

माझे सुंदर, टुमदार खैराव गाव सांगली जिल्हामध्ये प्रसिद्ध आहे.

धन्यवाद!

         

ऋणनिर्देश आणि संकलन 


श्री. भारत सखाराम क्षिरसागर                                                             

(सहायक शिक्षक)       

यांच्या सौजन्याने.....!


#####################################

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
 इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
bhausahebmahanor.blogspot.com
  या ब्लॉगच्या होम पेज वरील कॅटेगरी (catagory ) वरील ऑप्शन ला जा आणि इतर ब्लॉग वाचा .आवडलेला ब्लॉग आपल्या मित्रांना ,सहकाऱ्यांना  whatsapp, facebook द्वारे शेअर करा .
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
 भविष्यात इतर आणखी काही लेख वाचण्यासाठी माझ्या
 bhausahebmahanor.blogspot.com
या ब्लॉगला फॉलो करा ; की जेणेकरून नवीन लेख पब्लिश झालेची नोटीफिकेशन आपोआप मिळेल.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
  एखादा ब्लॉग आवडल्यास , पोस्ट वाचताना उजव्या कोपऱ्यात वरील ऑपशन(तीन टिंब ) वर  जाऊन आपल्या मित्रांना  whatsapp किंवा facebook द्वारे  share करु शकता.किंवा आपल्याला आलेली  लिंक शेअर/फॉरवर्ड करा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

#####################################








                                                               



Friday, April 25, 2025

श्री आण्णासाहेब भोसले सर - सेवानिवृत्ती निमित्त मुलाखत

 श्री अण्णासाहेब भोसले रा.-  येळवी,

सेवानिवृत्ती निमित्त बातचीत......!



 ता- जत,  जि- सांगली.  आज दि. 31 मे 2025 रोजी नियत वयोमानानुसार भोसले सरांची सेवानिवृत्ती होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या जीवनाचा   घेतलेला आढावा. एक जून 1967 ही सरांची लावलेली सरकारी जन्मतारीख होय. 30 सप्टेंबर 1992  ही सारी अखंड नेमणूक तारीख. सरांचे शिक्षण एसएससी डीएड असून देखील बारावी सायन्स नंतर डीएड हा कोर्स पूर्ण केला.  बारावी सायन्स नंतर लवकर नोकरी मिळावी म्हणून,  बेळगाव येथे  सॅनिटरी इन्स्पेक्टर चा कोर्स केला. तरीही नोकरी मिळाली नाही. दोन वर्षे नोकरी शोधण्यासाठी आणि बेकारी मध्ये गेली.


  सरांचे व्याही, जावई, व्याहीचे भाऊ संपूर्ण फॅमिली वकिली करतात. मुलीची ननंद देखील वकिली करतात. 


 लग्नानंतर पाच वर्षानंतर पहिली मुलगी झाली;  पहिल्या मुलीच्या जन्मानंतर नऊ वर्षांनी मुलगा जन्मला. तिचं लग्न झालेले आहे.  एक कन्या एलएलबी करून विवाहित आहे. येळवीच्या तलावातून स्वतंत्र पाईपलाईन शेतीसाठी सरांनी  केलेली आहे.  शेतीमध्ये डाळिंब, ऊस  ,मका , तूर इत्यादी नगदी पिके घेतली जातात. 

तंत्रज्ञानावर आधारित शेती केली जाते. स्वतःचा 27 एच. पी. सोनालिका ट्रॅक्टर आहे.  ठिबक वर शेतीत पिके घेतली जातात. जत तालुक्यातील शेती ही  पावसावर आधारित असते. जत तालुका दुष्काळी पट्टा असून देखील भोसले सरांकडून चांगले उत्पन्न काढण्याचा प्रयत्न केला जातो.  वडीलार्जित दहा एकर आणि नोकरी कालावधी मध्ये दहा एकर जमीन खरेदी केलली आहे. येळवी गावात  खैराव रोडला एक गुंठामध्ये चार व्यापारी गाळे काढलेले आहेत. सध्या शिकून इंजिनियर झाले तरी वीस हजार रुपये पगार मिळतो. त्यापेक्षा एकच मुलगा आहे, त्याने गावी राहून  शेतीवाडी केलेली परवडते. असे सरांना वाटते. आता उच्च शिक्षणाने देखील नोकरी नाही;  म्हणून सरांनी हा शेतीचा मार्ग निवडला. मुलगा सध्या मंगळवेढा येथे आयटीआय करत आहे. 

भविष्यात गावात शेतकरी मॉल सुरू करण्याचा सरांचा मानस आहे.

30 सप्टेंबर 1992 मध्ये नोकरीची सुरुवात झाली.  पहिली नेमणूक जि.प. प्राथमिक शाळा, महाडिकवाडी, तालुका-  आटपाडी, जिल्हा-  सांगली;  येथे सरांची नेमणूक झाली.  जून 1994 साली  जि.प. प्राथमिक शाळा,खैराव ता- जत, जि-सांगली  येथे बदली झाली. त्यानंतर सनमडी ,रानमळा (येळवी) , अहिल्यानगर (येळवी) , तांबेवाडी( घोलेश्वर)  पुन्हा अहिल्यानगर , पुन्हा सनमडी आणि शेवटी रानमळा(येळवी)  येथे सेवानिवृत्ती. नोकरी कालावधीत पदवीधर शिक्षकांच्या साठी शाळा उपलब्ध होतील की नाही या शंकेतून ग्रॅज्युएशन पूर्ण न करता  प्लेन प्राथमिक शिक्षक म्हणूनच नोकरी करायचे असं ठरवलं.  प्रथम भोसले सरांची  नेमणूक ओबीबी या योजनेखाली जिल्ह्यातील सर्व शाळा द्विशिक्षकी करायच्या या हेतूने शासनाने प्रत्येक शाळेवर दोन शिक्षकांची नेमणूक केली. 

1995 साली आम्ही भाऊ भाऊ एकत्र होतो ते वेगळे राहिलो;तेव्हा शेतीमध्ये आमच्याकडे डाळिंबीची बाग होती.  बायकांना दिवसभराचा खुरपण्याचा पगार दहा रुपये होता. आहे त्या पगारात शेती देखील टिकवायची आणि नोकरीही करायची.


भोसले सरांचा आवडीचा विषय गणित.  खैराव यथे सातवीचे वर्ग शिक्षक म्हणून काम करत असताना गणित हा विषय अत्यंत आवडीने शिकवला. इयत्ता पाचवी सहावी सातवी ला देखील गणित विषय शिकवला.  बारावी सायन्स असल्यामुळे पाचवी ते सातवी या वर्गासाठी इंग्रजी देखील सरांनी सहजपणे शिकवलेला आहे.  बेळगावला एक बारावीनंतर कोर्स केला स्वच्छता निरीक्षक (सॅनिटरी इन्स्पेक्टर) त्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी दोन वर्षे प्रयत्न केले. सॅनेटरी इन्स्पेक्टरची नोकरी मिळाली नाही म्हणून सरांनी डीएड करण्याचा निश्चय केला आणि डीएड चे शिक्षण पूर्ण केले.  डी.एड.पूर्ण झाल्यानंतर  पडळकरवाडी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे आश्रम शाळेवर सहा महिन्यासाठी नोकरी केली.  आणि महाराष्ट्र राज्य निवड मंडळ पुणे अंतर्गत परीक्षा होऊन 1992 साली आटपाडी तालुक्यात नोकरीची सुरुवात झाली. 

सत्यजित आवटे नावाचा खैराव शाळेतील विद्यार्थी हा एपीआय (API) झालेला आहे. सध्या आष्टा ,ता - वाळवा. जि- सांगली येथे पोलीस स्टेशनमध्ये तो काम करतो. सरांना कबड्डी,  खो-खो या खेळांची आवड आहे. शाळा पातळीवर हे खेळ आवडीने घेतले आहेत. 

जिल्हा परिषद सांगली अंतर्गत बौद्धिक स्पर्धांमध्ये एकांकिका स्पर्धाप्रकारामध्ये सलग तीन वर्ष रानमळा शाळेचे विद्यार्थी जिल्हा पातळीवर स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. वसंतदादा सामाजिक सेवाभावी संस्था मार्फत शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्ती पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार त्याचबरोबर त्या वर्गाला शिकवणारे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचा एकत्रित सत्कार सांगली येथे 2007 साली झाला होता

 

पंचायत समिती जत,  शिक्षण विभाग यांच्याकडून तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार 2007 साली प्राप्त झालेला आहे.   त्याचबरोबर ग्रामपंचायत येळवी यांच्याकडून देखील आदर्श शिक्षक म्हणून  त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आलेला आहे. तसेच प्रकाशराव जमदाडे युथ फाऊंडेशन,येळवी या संस्थेकडून देखील तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार सरांना प्राप्त झालेला आहे.  खैराव शाळेत असताना शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार सांगली  येथे करण्यात आला. 



कन्या पल्लवी हिने प्राथमिक शाळेत असतानाच वकील व्हायचं ठरवलेले होते. तिने लॉ पूर्ण केला. सध्या ती सांगोला येथे  वकिलीचा व्यवसाय करते. जावई वकील आहेत.व्याही वकील आहेत , व्याहिंचे भाऊ देखील वकील आहेत. मुलीची  नंनंद देखील वकील आहे.

सेवकालावधीमध्ये वृक्षारोपण , विद्यार्थ्यांना साहित्य शैक्षणिक साहित्य वाटप इत्यादी चांगली कामे केलेली आहेत. जि.प.शाळा, रानमळा शाळेसाठी जागा आणि इमारत मिळवण्याचे काम सरांनी केलेले आहे. शाळेसाठी उपलब्ध जागा शेतकऱ्याकडून तसेच ग्रामस्थांकडून मिळवण्यासाठी चांगले प्रयत्न केले आणि त्या ठिकाणी सध्या जिल्हा परिषद रानमळा शाळेची इमारत उभी आहे.  जिल्हा परिषद शाळा रानमळा ही शाळा पूर्वीचे वॉलेंट्री शाळा होती. ती घरात भरायची परंतु जेव्हा जिल्हा परिषदेकडे वर्ग झाले तेव्हा ग्रामस्थांकडून जागा बक्षिस पत्र करून घेणे. भोसले सर यांनी शाळा बांधकाम , खोल्या बांधकाम करून घेणे हे महत्त्वाचे काम अण्णासाहेब भोसले सरांनी केले.  सरांचे आयुष्य निरोगी आहे. दोन भाऊ आणि चार बहिणी असे एकूण सात भावंड आहेत. त्यामध्ये सर्वात लहान आण्णासाहेब हे शिक्षक आहेत. सरांच्या अनेक विद्यार्थी शिक्षक पोलीस सैन्य भरती अशा ठिकाणी काम करतात.